शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

खिचडी शिजविणे, शौचालय बांधणे ही काय शिक्षकांची कामे झाली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जनगणना, आपत्ती निवारण आणि प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्य याशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जनगणना, आपत्ती निवारण आणि प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्य याशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात येऊ नये, अशी आरटीई -२००९ कलम २७ मध्ये स्पष्ट तरतूद आहे. यानुसार आता अलाहाबाद उच्च न्यायालयानेदेखील शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असा आदेश नुकताच दिला आहे. या आदेशाचे काटेकोर पालन होऊन शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका होणे गरजेचे आहे. यासाठी खिचडी शिजवणे, शौचालय बांधणे आदी कामांना आता विरोध केला जात आहे. ही काय गुरुजींची कामे आहेत का ?. पण ती शिक्षकांकडून जबरदस्तीने करून घेतली जात असल्याचा संताप जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे.

आपत्ती निवारण कार्यात शिक्षकांना नियुक्त करण्याबाबत शिक्षणाचा हक्क या कायद्यामध्ये नमूद आहे. त्यानुसार शिक्षकांना नेमणुका देताना सारासार विवेकाने विचार केला जावा, अशी अपेक्षा शिक्षकांची आहे. परंतु, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखवून प्रशासकीय यंत्रणेने शिक्षकांना वाटेल ती कामे दिल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे. जिल्ह्यातील शिक्षक सध्या ठिकठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दिमतीला आहेत. गावांतील प्रत्येक कामासाठी शिक्षकांचा सहभाग घेतल्याशिवाय ते काम पूर्ण केले जात नाही. कोणत्याही योजना राबवण्यासाठी शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग प्रशासन घेणार म्हणजे घेणारच. पण आता आता न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होणार, अशी अपेक्षा शिक्षकांमध्ये ऐकायला मिळाली.

मनमानी, अन्यायकारी, मानहानी होणारी कामे शिक्षकांकडून केली जात असल्याच्या संतापजनक घटना सध्या जिल्ह्यातील शिक्षकांकडून ऐकवल्या जात आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात जूनमध्ये शिक्षकांना पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू चोरीच्या नियंत्रणासाठी नियुक्ती देण्यात आल्याची घटना आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी २१ शिक्षकांना तीन शिफ्टमध्ये दिवस-रात्र नियुक्तीचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले होते. काही ठिकाणी दारूच्या दुकानांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी शिक्षकांना नेमणुका दिल्या गेल्या आदी चर्चा जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये जोरदारपणे ऐकायला मिळत आहेत. या मनमानी व अन्यायाविरूद्ध शिक्षक संघटना राज्यस्तरीय आंदोलन छेडण्याचा तयारीत आहेत.

_---------