शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत उरलेय काय?

By admin | Updated: July 7, 2017 06:19 IST

मीरा- भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उरले आहे काय? असा खडा सवाल करत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उरले आहे काय? असा खडा सवाल करत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी जाहीर केले; तर आघाडीचा फायदा काँग्रेसलाच होणार असून प्रदेश नेतृत्व आघाडीचा निर्णय घेईल, असे सांगत माजी खासदार संजीव नाईक यांनी ‘वरून’ आघाडीचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पण भिवंडीत ज्याप्रमाणे काँग्रेसने राष्ट्रवादीचा दबाव झुगारून देत स्वबळावर यश मिळवले, त्याचाच कित्ता मीरा-भार्इंदरमध्येही गिरवला जाण्याची शक्यता आहे.मीरा- भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासह पालिकेतील २८ पैकी २७ नगरसेवक, माजी जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी बाहेर पडल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी असताना जयंत पाटील यांंनी काँग्रेसशी आघाडीचा प्रस्ताव पुढे केला होता. पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याने दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांमध्ये चर्चा झाली होती. परंतु अंतर्गत वादातून पाटील यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या १२ इच्छुक उमेदवारांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्यासोबत अनेक उमेदवार, पदाधिकारी राष्ट्रवादी सोडून गेल्याने पक्षाची स्थिती अधिकच बिकट झाली. उरल्यासुरल्या नेत्यांतील गटबाजी संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने पक्ष पोखरला गेला आहे.राष्ट्रवादीतून मोठा गट काँग्रेसमध्ये आल्याने आता स्थानिक काँग्रेस नेतृत्वानेही आघाडी करण्याचा निर्णय बदलला आहे. सध्या राष्ट्रवादीची भिस्त ही माजी मंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक या पितापुत्रांवर आहे. मीरा- भाईंदरमध्ये दोघांचाही जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे निवडणुकीची धुरा नाईक कुटुंबाच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे निवडणुकीत वाद नको म्हणून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा विषयही निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवण्याची भूमिका निष्ठावंतांनी घेतली आहे.संजीव नाईक यांनी मीरा-भार्इंदरमध्ये छोट्या भावाची भूमिका घेत काँग्रेससोबत आघाडी करण्याची भूमिका प्राधान्याने घेतली. त्या शिवाय समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांनी राष्ट्रवादीत काही उरलेच नसल्याने आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही, असे सावंत यांनी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या जयंत पाटील व समर्थकांनी अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सोबत घरोबा करण्यास विरोध केल्याचे कारणही सांगितले जाते.