शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
२६ पर्यटकांच्या हत्येचा बदला! सुरक्षा दलांनी पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी, ऑपरेशन महादेवला मिळालं यश
3
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
5
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
6
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
7
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
8
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
10
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
11
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
12
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
13
'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन 
14
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
15
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
16
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
17
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
18
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
19
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
20
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

राष्ट्रवादीत उरलेय काय?

By admin | Updated: July 7, 2017 06:19 IST

मीरा- भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उरले आहे काय? असा खडा सवाल करत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उरले आहे काय? असा खडा सवाल करत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी जाहीर केले; तर आघाडीचा फायदा काँग्रेसलाच होणार असून प्रदेश नेतृत्व आघाडीचा निर्णय घेईल, असे सांगत माजी खासदार संजीव नाईक यांनी ‘वरून’ आघाडीचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पण भिवंडीत ज्याप्रमाणे काँग्रेसने राष्ट्रवादीचा दबाव झुगारून देत स्वबळावर यश मिळवले, त्याचाच कित्ता मीरा-भार्इंदरमध्येही गिरवला जाण्याची शक्यता आहे.मीरा- भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासह पालिकेतील २८ पैकी २७ नगरसेवक, माजी जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी बाहेर पडल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी असताना जयंत पाटील यांंनी काँग्रेसशी आघाडीचा प्रस्ताव पुढे केला होता. पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याने दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांमध्ये चर्चा झाली होती. परंतु अंतर्गत वादातून पाटील यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या १२ इच्छुक उमेदवारांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्यासोबत अनेक उमेदवार, पदाधिकारी राष्ट्रवादी सोडून गेल्याने पक्षाची स्थिती अधिकच बिकट झाली. उरल्यासुरल्या नेत्यांतील गटबाजी संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने पक्ष पोखरला गेला आहे.राष्ट्रवादीतून मोठा गट काँग्रेसमध्ये आल्याने आता स्थानिक काँग्रेस नेतृत्वानेही आघाडी करण्याचा निर्णय बदलला आहे. सध्या राष्ट्रवादीची भिस्त ही माजी मंत्री गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक या पितापुत्रांवर आहे. मीरा- भाईंदरमध्ये दोघांचाही जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे निवडणुकीची धुरा नाईक कुटुंबाच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे निवडणुकीत वाद नको म्हणून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा विषयही निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवण्याची भूमिका निष्ठावंतांनी घेतली आहे.संजीव नाईक यांनी मीरा-भार्इंदरमध्ये छोट्या भावाची भूमिका घेत काँग्रेससोबत आघाडी करण्याची भूमिका प्राधान्याने घेतली. त्या शिवाय समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांनी राष्ट्रवादीत काही उरलेच नसल्याने आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही, असे सावंत यांनी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या जयंत पाटील व समर्थकांनी अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सोबत घरोबा करण्यास विरोध केल्याचे कारणही सांगितले जाते.