शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

समस्या सोडवण्यासाठी काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:24 IST

केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी पदभार घेऊन तीन महिने उलटले आहेत.

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी पदभार घेऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, तरीही शहरातील अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी बोडके यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सुदेश चुडनाईक, राहुल कामत, सागर जेधे, हर्षद पाटील, दीपिका पेडणेकर आदी या वेळी उपस्थित होते.सर्वसामान्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही. सृतिकागृह नव्याने बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधी ठेवला आहे. त्यामुळे या कामाची निविदा कधी काढणार, त्याचे काम कधी होणार? ठाकुर्ली पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रेल्वे स्थानकांतील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना चालता येत नाही. शहरांतील बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. घनकचरा प्रक्रियेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. अशा विविध प्रश्नांकडे मनसेने लक्ष वेधले आहे.शहरातील प्रश्नांबाबत अभ्यास करावा लागेल, लगेच काही सांगता येत नाही, असे आयुक्त सुरुवातीला सांगत होते. मात्र, तीन महिने झाल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार आहात, असा जाब मनसेने विचारला.>ठाकुर्ली पुलावर पदपथ बांधण्याची मागणीठाकुर्ली उड्डाणपुलावर पादचाºयांसाठी पदपथ नसल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे. पुलाच्या पुढील टप्प्यातील कामात पदपथ बांधावा, अशी मागणी मनसेचे परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे.पुलावर सोमवारी थ्री व्हिलर टेम्पोचे पुढील चाक हवेत उभे राहिले. तसेच टेम्पो संरक्षक कठड्याला टेकला. परंतु, पदपथ असता तर तो टेम्पो कठड्यापर्यंत जाऊ शकला नसता. पदथामुळे वाहन कठड्याला धडकून रूळावर पडण्याची शक्यताही कमी होईल. त्यासाठी रस्त्याच्या बाजुला काही उंचीवर पदपथ बांधावा, अशा मागणीचे निवेदन म्हात्रे यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे यांना दिले आहे.