शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी बारावीच्या परीक्षांबाबत ...

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे - राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून, शासन त्याच्या पर्यायांबाबत विचार करत आहे; मात्र विद्यार्थी वर्ग आणि पालक संभ्रमात आहेत.

दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्या परीक्षांबाबतही तितकीच उत्सुकता विद्यार्थी, पालकांमध्ये असते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यातही दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले; मात्र मे महिना उलटून गेला तरी बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही. दरवर्षी साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकालही जाहीर होतो; मात्र यंदा अद्याप परीक्षांबाबत निर्णय न झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आता या बारावीच्या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

--------------

-----------------

विद्यार्थ्यांचे कोट

दरवर्षी बारावीच्या परीक्षा झाल्यावरच्या काळात विद्यार्थी इतर प्रवेश परीक्षांची तयारी करतात; मात्र यंदा कालावधीपण निघून गेला, अजून बारावीची परीक्षा झाली नाही. याच्यापुढे इतर परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार आणि नवे वर्ष कधी सुरू होणार, काहीच कळत नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात.

दीक्षा वाकटे, विद्यार्थिनी

---------------

बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात. आमच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्या घेतल्या नाही, हे योग्य; पण त्याला पर्यायी विचार करायला हवा होता. अजून ठोस निर्णय झालेला नाही, आम्ही विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास आता कोणत्या परीक्षांचा करावा, हाही प्रश्नच पडला आहे.

रमण बनकर, विद्यार्थी

--------------

----------------

शिक्षणतज्ज्ञ कोट

बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणांच्या आधारे त्यांचे मू्ल्यांकन करता येईल. तसेच प्रवेशाच्यावेळी बारावीच्या गुणांचे निकष न लावता विविध कोर्सच्या प्रवेश परीक्षा घेता येतील, असे मत एका शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

-----------

आता बराच उशीर झाला आहे. बारावीच्या परीक्षा घेऊन नंतर कधी निकाल, प्रवेश परीक्षा घेणार, त्यापेक्षा परीक्षा रद्द करून इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेता येतील. विद्यार्थ्यांनाही त्या दृष्टीने अभ्यास करता येईल, असे मला वाटते. एकूणच शासनाला जो योग्य वाटेल तो पर्यायी मार्ग याबाबत सुचवावा, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.

------

-----------

विद्यार्थी संख्या

१२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

ठाणे मनपातील विद्यार्थी - १७७६३

ठाणे जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ८६००३