शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी बारावीच्या परीक्षांबाबत ...

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे - राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून, शासन त्याच्या पर्यायांबाबत विचार करत आहे; मात्र विद्यार्थी वर्ग आणि पालक संभ्रमात आहेत.

दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्या परीक्षांबाबतही तितकीच उत्सुकता विद्यार्थी, पालकांमध्ये असते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यातही दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले; मात्र मे महिना उलटून गेला तरी बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही. दरवर्षी साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकालही जाहीर होतो; मात्र यंदा अद्याप परीक्षांबाबत निर्णय न झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आता या बारावीच्या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

--------------

-----------------

विद्यार्थ्यांचे कोट

दरवर्षी बारावीच्या परीक्षा झाल्यावरच्या काळात विद्यार्थी इतर प्रवेश परीक्षांची तयारी करतात; मात्र यंदा कालावधीपण निघून गेला, अजून बारावीची परीक्षा झाली नाही. याच्यापुढे इतर परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार आणि नवे वर्ष कधी सुरू होणार, काहीच कळत नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात.

दीक्षा वाकटे, विद्यार्थिनी

---------------

बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात. आमच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्या घेतल्या नाही, हे योग्य; पण त्याला पर्यायी विचार करायला हवा होता. अजून ठोस निर्णय झालेला नाही, आम्ही विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास आता कोणत्या परीक्षांचा करावा, हाही प्रश्नच पडला आहे.

रमण बनकर, विद्यार्थी

--------------

----------------

शिक्षणतज्ज्ञ कोट

बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणांच्या आधारे त्यांचे मू्ल्यांकन करता येईल. तसेच प्रवेशाच्यावेळी बारावीच्या गुणांचे निकष न लावता विविध कोर्सच्या प्रवेश परीक्षा घेता येतील, असे मत एका शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

-----------

आता बराच उशीर झाला आहे. बारावीच्या परीक्षा घेऊन नंतर कधी निकाल, प्रवेश परीक्षा घेणार, त्यापेक्षा परीक्षा रद्द करून इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेता येतील. विद्यार्थ्यांनाही त्या दृष्टीने अभ्यास करता येईल, असे मला वाटते. एकूणच शासनाला जो योग्य वाटेल तो पर्यायी मार्ग याबाबत सुचवावा, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.

------

-----------

विद्यार्थी संख्या

१२ वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

ठाणे मनपातील विद्यार्थी - १७७६३

ठाणे जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ८६००३