शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेने पुन्हा एकदा पुसली तोंडाला पाने

By admin | Updated: May 16, 2017 00:03 IST

पश्चिम रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांच्या नावासह कारभारात अनेकदा मागणी करूनही मराठी भाषेला प्राधान्य न दिल्याने मराठी एकीकरण समितीने पश्चिम विभागीय अतिरिक्त व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : पश्चिम रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांच्या नावासह कारभारात अनेकदा मागणी करूनही मराठी भाषेला प्राधान्य न दिल्याने मराठी एकीकरण समितीने पश्चिम विभागीय अतिरिक्त व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे. पश्चिम रेल्वेकडे अनेकदा पाठपुरावा केला. विभागीय व्यवस्थापक नुकूल जैन यांची भेट घेतल्यानंतरही मराठी भाषेला प्राधान्य मिळत नसल्याने समितीने मुंबई सेंट्रल येथे पश्चिम रेल्वेच्या विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन छेडले. यानंतरही रेल्वे प्रशासनाला जाग न आल्याने त्यांनी मराठी भाषेला सापत्न वागणूक देण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे. त्यात भार्इंदर रेल्वे स्थानकाला भायंदर असे नाव दिले आहे. ही बाब सामान्य प्रवाशांच्या उच्चारात संभ्रम निर्माण करणारी तसेच मराठीला दुय्यम स्थान देणारी आहे. त्यातच उद्घोषणा, माहिती फलक, तिकिटामागील सूचनांमधून मराठी भाषेला हद्दपार केले असून इतर राज्यांतील प्रादेशिक भाषांना मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाते. पश्चिम रेल्वेने त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित असतानाही तिला सापत्न वागणूक देणे सुरूच ठेवले आहे. काही अमराठी अधिकाऱ्यांच्या मुजोर कारभारामुळेच मराठी भाषेची गळचेपी होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. त्यातच राज्य सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला असतानाही रेल्वेकडून भाषा अधिनियमाची पायमल्ली केली जात आहे. मराठी भाषेला प्राधान्य देण्यासह कारभारात मराठीचा समावेश करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय व्यवस्थापकांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन मराठीला प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यावेळी विभागीय व्यवस्थापकांनी समितीला सकारात्मक प्रतिसाद दिला. समितीने दिलेल्या मुदतीत रेल्वे प्रशासनाने कार्यवाही न केल्याने समितीने विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन छेडले. त्यालाही रेल्वे प्रशासनाने दाद न दिल्याने अखेर समितीने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी समितीने पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकांना नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यात महाराष्ट्रात इतर भाषांच्या दडपणामुळे मराठीचे खच्चीकरण केले जात आहे व मराठीचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातच मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.