शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

पश्चिम रेल्वेने पुन्हा एकदा पुसली तोंडाला पाने

By admin | Updated: May 16, 2017 00:03 IST

पश्चिम रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांच्या नावासह कारभारात अनेकदा मागणी करूनही मराठी भाषेला प्राधान्य न दिल्याने मराठी एकीकरण समितीने पश्चिम विभागीय अतिरिक्त व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : पश्चिम रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांच्या नावासह कारभारात अनेकदा मागणी करूनही मराठी भाषेला प्राधान्य न दिल्याने मराठी एकीकरण समितीने पश्चिम विभागीय अतिरिक्त व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे. पश्चिम रेल्वेकडे अनेकदा पाठपुरावा केला. विभागीय व्यवस्थापक नुकूल जैन यांची भेट घेतल्यानंतरही मराठी भाषेला प्राधान्य मिळत नसल्याने समितीने मुंबई सेंट्रल येथे पश्चिम रेल्वेच्या विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन छेडले. यानंतरही रेल्वे प्रशासनाला जाग न आल्याने त्यांनी मराठी भाषेला सापत्न वागणूक देण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे. त्यात भार्इंदर रेल्वे स्थानकाला भायंदर असे नाव दिले आहे. ही बाब सामान्य प्रवाशांच्या उच्चारात संभ्रम निर्माण करणारी तसेच मराठीला दुय्यम स्थान देणारी आहे. त्यातच उद्घोषणा, माहिती फलक, तिकिटामागील सूचनांमधून मराठी भाषेला हद्दपार केले असून इतर राज्यांतील प्रादेशिक भाषांना मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाते. पश्चिम रेल्वेने त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित असतानाही तिला सापत्न वागणूक देणे सुरूच ठेवले आहे. काही अमराठी अधिकाऱ्यांच्या मुजोर कारभारामुळेच मराठी भाषेची गळचेपी होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. त्यातच राज्य सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला असतानाही रेल्वेकडून भाषा अधिनियमाची पायमल्ली केली जात आहे. मराठी भाषेला प्राधान्य देण्यासह कारभारात मराठीचा समावेश करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय व्यवस्थापकांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन मराठीला प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यावेळी विभागीय व्यवस्थापकांनी समितीला सकारात्मक प्रतिसाद दिला. समितीने दिलेल्या मुदतीत रेल्वे प्रशासनाने कार्यवाही न केल्याने समितीने विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन छेडले. त्यालाही रेल्वे प्रशासनाने दाद न दिल्याने अखेर समितीने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी समितीने पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकांना नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यात महाराष्ट्रात इतर भाषांच्या दडपणामुळे मराठीचे खच्चीकरण केले जात आहे व मराठीचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातच मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.