शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

राज्य महामार्गावर पाइपलाइनसाठी ‘एमएमआरडीए’ने बांधली विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

राज्य महामार्गाचे काम करताना एमएमआरडीएचे नियोजन नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. या राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करताना अंतर्गत जलवाहिन्या ...

राज्य महामार्गाचे काम करताना एमएमआरडीएचे नियोजन नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. या राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करताना अंतर्गत जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे निधीअभावी आहे त्या स्थितीत रस्ता पूर्ण करून घेण्याची घाई अधिकाऱ्यांनी केली आहे. एमएमआरडीएच्या घाईच्या कामामुळे हा राज्य महामार्ग आता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. जलवाहिनी हटविता न आल्याने त्या जलवाहिनीवरच काॅंंक्रीट टाकून रस्ते करण्यात येत आहेत. काही ठिकाणी या जलवाहिन्या वर आल्याने आणि काही ठिकाणी या जलवाहिनीचे वॉल आल्याने त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने आणि हे काम लवकर उरकण्याच्या अनुषंगाने आता जलवाहिनी ज्या ठिकाणी वर आली आहे, त्या ठिकाणी आरसीसी भिंती उभारून ते काम तसेच सोडून दिले आहे. वर असलेल्या जलवाहिनीच्या ठिकाणी विहीरसदृश भिंत उभारली गेल्याने आता हीच विहीर वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. रात्री भिंतीचा अंदाज न आल्याने अनेक वाहने या भिंतीवर धडकत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेली ही भिंत काढून टाकावी, अशा सूचना आमदार बालाजी किणीकर यांनी दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही ती भिंत काढण्याचा दिखावा केला. मात्र प्रत्यक्षात भिंत काढल्यानंतर त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणार कसे आणि जलवाहिनी स्थलांतरित करणार कशी याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

राज्य महामार्गाच्या तीन किलोमीटरच्या अंतरावर तब्बल सहा ठिकाणी अशी रस्त्याच्या मध्यभागी विहीरसदृश्य भिंत उभारण्यात आली आहे. या विहिरीत पाणी नसले तरी पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या असल्याने त्या स्थलांतरित कराव्यात कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

----------------फोटो आहे.