शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कल्याणमधील गांडूळ खत प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:47 IST

ओल्या कचऱ्याचा तुटवडा : महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका

कल्याण : पश्चिमेतील म्हसोबा मैदानात शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, त्यास महापालिका प्रशासनाकडून पुरेसा ओला कचरा पुरविला जात नसल्याने हा प्रकल्प बंद पडला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता त्याला कारणीभूत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

महापालिका हद्दीत कचºयाची समस्या मोठी आहे. आधारवाडी डम्पिंगची क्षमता संपल्याने ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी सौराष्ट्र या कंत्राटदार कंपनीने तेथे प्रकल्प उभारला आहे. मात्र, डम्पिंगवर दररोज ६४० मेट्रीक टन कचरा टाकला जातो. तेथे सुरू असलेला प्रकल्प व तेथे दररोज पडणारा कचरा यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे उंबर्डे व अन्य घनकचरा प्रकल्प सुरू झाल्याशिवाय हे डम्पिंग बंद होणार नाही. डम्पिंगवरील कचºयाच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ओल्या कचºयावर प्रक्रिया झाल्यास हा कचरा डम्पिंगवर जाणार नाही. त्यामुळे दुर्गंधीच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल.

एक हजार किलो ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प पाटील यांनी मनसृष्टी या संस्थेच्या पुढाकारातून त्यांच्या प्रभागातील एका मैदानात २०१६ मध्ये सुरू केला. चारपाच महिने कचºयावर प्रक्रिया झाली. मात्र, नंतर प्रकल्पास केवळ ५०० किलो ओला कचरा प्राप्त होऊ लागला. या प्रकल्पाची क्षमता एक हजार किलोची होती. पुरेशा कचºयाअभावी प्रकल्पातील गांडूळ मरण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे प्रकल्प बंद पडण्यास महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, असे पाटील यांचे म्हणणे आहे.महापालिकेने १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पाच ठिकाणाचे प्रकल्प तयार झाले. उंबर्डे व बारावे येथे बायोगॅस प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांनाही पुरेसा ओला कचरा प्रक्रियेसाठी मिळत नसल्याची बाब स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी नुकतीच महापालिकेच्या आढावा बैठकीत मांडली होती. कचरा वर्गीकरण करण्याबाबत महापालिका जागृती करत आहे. मात्र, प्रकल्पच नसल्याने वर्गीकरणाचा हेतू कसा साध्य होणार, असा सवाल नागरिक करतात. महापालिकेने १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा वर्गीकरण करून गोळा करण्यासाठी १०७ कोटींचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, पाटील यांच्या आरोपांसंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही....तर कचºयाची विल्हेवाट प्रभागांतचप्रक्रियेसाठी आणलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून ओला कचरा प्रकल्पासाठी घ्यावा लागत होता. पाटील यांच्या प्रभागातील प्रकल्प यशस्वी झाला असता तर हाच प्रयोग अन्य प्रभागांत सुरू करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असता. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील कचºयाची तेथेच विल्हेवाट लागून गांडूळ खत तयार झाले असते. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण