शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील गांडूळ खत प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:47 IST

ओल्या कचऱ्याचा तुटवडा : महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका

कल्याण : पश्चिमेतील म्हसोबा मैदानात शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी ओल्या कचºयापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, त्यास महापालिका प्रशासनाकडून पुरेसा ओला कचरा पुरविला जात नसल्याने हा प्रकल्प बंद पडला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता त्याला कारणीभूत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

महापालिका हद्दीत कचºयाची समस्या मोठी आहे. आधारवाडी डम्पिंगची क्षमता संपल्याने ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी सौराष्ट्र या कंत्राटदार कंपनीने तेथे प्रकल्प उभारला आहे. मात्र, डम्पिंगवर दररोज ६४० मेट्रीक टन कचरा टाकला जातो. तेथे सुरू असलेला प्रकल्प व तेथे दररोज पडणारा कचरा यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे उंबर्डे व अन्य घनकचरा प्रकल्प सुरू झाल्याशिवाय हे डम्पिंग बंद होणार नाही. डम्पिंगवरील कचºयाच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ओल्या कचºयावर प्रक्रिया झाल्यास हा कचरा डम्पिंगवर जाणार नाही. त्यामुळे दुर्गंधीच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल.

एक हजार किलो ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प पाटील यांनी मनसृष्टी या संस्थेच्या पुढाकारातून त्यांच्या प्रभागातील एका मैदानात २०१६ मध्ये सुरू केला. चारपाच महिने कचºयावर प्रक्रिया झाली. मात्र, नंतर प्रकल्पास केवळ ५०० किलो ओला कचरा प्राप्त होऊ लागला. या प्रकल्पाची क्षमता एक हजार किलोची होती. पुरेशा कचºयाअभावी प्रकल्पातील गांडूळ मरण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे प्रकल्प बंद पडण्यास महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, असे पाटील यांचे म्हणणे आहे.महापालिकेने १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पाच ठिकाणाचे प्रकल्प तयार झाले. उंबर्डे व बारावे येथे बायोगॅस प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांनाही पुरेसा ओला कचरा प्रक्रियेसाठी मिळत नसल्याची बाब स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी नुकतीच महापालिकेच्या आढावा बैठकीत मांडली होती. कचरा वर्गीकरण करण्याबाबत महापालिका जागृती करत आहे. मात्र, प्रकल्पच नसल्याने वर्गीकरणाचा हेतू कसा साध्य होणार, असा सवाल नागरिक करतात. महापालिकेने १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा वर्गीकरण करून गोळा करण्यासाठी १०७ कोटींचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, पाटील यांच्या आरोपांसंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही....तर कचºयाची विल्हेवाट प्रभागांतचप्रक्रियेसाठी आणलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून ओला कचरा प्रकल्पासाठी घ्यावा लागत होता. पाटील यांच्या प्रभागातील प्रकल्प यशस्वी झाला असता तर हाच प्रयोग अन्य प्रभागांत सुरू करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असता. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील कचºयाची तेथेच विल्हेवाट लागून गांडूळ खत तयार झाले असते. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण