शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शहापूर तालुक्यात आठवडी बाजारात झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शहापूर तालुक्यात कोरोनाची जणू कुणाला भीतीच राहिली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. सरकारने काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : शहापूर तालुक्यात कोरोनाची जणू कुणाला भीतीच राहिली नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. सरकारने काही निर्बंध घातले असले तरी याची कुठेही काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. लॉनवर होणारी लग्न गेल्या काही दिवसापासून बंद असली तरीसुद्धा घराजवळची लग्न मात्र मोठ्या थाटामाटात, गर्दीत होत आहेत. जणू काही आपल्याला कोरोना होणारच नाही अशा रुबाबात मंडळी पाहावयास मिळतात. मागील काळात आदिवासींपासून दूर असलेला कोरोना आता पाय पसरू लागला आहे. त्यातच आदिवासी समाजातही लग्नकार्यात तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करीत आहेत.

आम्ही सकाळपासून उन्हात असतो त्यामुळे आम्हाला कोरोना होणार नाही असा त्यांना विश्वास आहे. मात्र आज तालुक्यामध्ये कोरोनासाठी लग्न समारंभ, आठवडी बाजार, बस्थानक व बससाठी होणारी गर्दी कोरोनासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास हातभार लागत आहे. मागील महिन्यात केवळ एक ते दोन रुग्ण सापडत असताना आता ही संख्या २५ च्या वर जात असल्याने ही धोक्याची घंटा नसेल कशावरून? कोरोनात आतापर्यंत १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास तालुक्यामध्ये येत्या काही दिवसात गंभीर चित्र निर्माण होऊ शकते. कोरोना खेड्यापाड्यांमध्ये पोहोचला असून या रुग्णांच्या संपर्कात येणारे अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यामध्ये होणारे लग्नसमारंभ, आठवडीबाजार, वाढदिवस,अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गर्दी. मास्क न वापरता होणारा नागरिकांचा संचार. आठवडी बाजार यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्यातरी दिसत आहेत.

शहापूर ,डोळखांब, अघई, शेणवा, कसारा, वासिंदसारख्या मुख्य बाजारपेठा तालुक्यांमध्ये आहेत. येथे आठवडी बाजार भरतात. तालुक्यात नाट्यगृह नसल्याने ही भर इतर कार्यक्रमात भरून निघते. तालुक्यामध्ये आज ना उद्या लॉकडाऊन होईल अशा प्रकारच्या वावड्या उठत असल्याने या आठवडी बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत आहेत.

शहापूर तालुक्यात अनेक समारंभ जोरात सुरू असून नागरिक अजिबात या आजाराबद्दल हवे तितके जागृत आहेत असे वाटत नाही. त्यासाठी त्यांनी आताच काळजी घेणे आवश्यक आहे.

- जयराम भोईर, सामाजिक कार्यकर्ते.