शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

लग्नसोहळे होताहेत धूमधडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोनाचा नियम पाळण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघेही अपयशी ठरत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोनाचा नियम पाळण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघेही अपयशी ठरत आहेत. नियम मोडून लग्न सोहळे किंवा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे तक्रारी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, तसेच लग्न आणि अंत्यसंस्कार विधीसाठी अटी घातल्या आहेत. तरी देखील या अटींची योग्य दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात आजही लग्नसोहळे मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात काही मोजक्याच हॉलमध्ये लग्नसोहळ्यासाठी अटींचे पालन केले जाते. मात्र, इतर हॉलमध्ये वर आणि वधू त्यांच्या कुटुंबीयांच्या जबाबदारीवर लग्नसोहळे थाटात पार पाडत आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी येऊ नये यासाठी तडजोडीचा मार्ग अवलंबला जातो.

अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी गर्दी करून सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात आहेत. शहरातील महत्त्वाचे मॅरेज हॉल आजही गर्दीने फुललेले दिसत आहेत. यासंदर्भात कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलीसही गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल करीत आहेत. हीच परिस्थिती बदलापुरात निर्माण झाली आहे.

--------------------

हॉटेलमधील कार्यक्रमाला गर्दी

अंबरनाथच्या जांभूळ भागात असलेल्या एस.थ्री पार्क या हॉटेलमध्ये गुरुवारी सायंकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. शेट्टी समाज बंड मुंबई कमिटीने या ठिकाणी गेट टूगेदर आयोजित केले होते. या कार्यक्रमाला १५० जणांची उपस्थिती होती. शिवाय कोरोना नियमांची येथे पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे याची दखल घेत हॉटेल मॅनेजर आणि आयोजकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.