शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

लग्नसोहळे होताहेत धूमधडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोनाचा नियम पाळण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघेही अपयशी ठरत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोनाचा नियम पाळण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघेही अपयशी ठरत आहेत. नियम मोडून लग्न सोहळे किंवा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे तक्रारी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, तसेच लग्न आणि अंत्यसंस्कार विधीसाठी अटी घातल्या आहेत. तरी देखील या अटींची योग्य दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात आजही लग्नसोहळे मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात काही मोजक्याच हॉलमध्ये लग्नसोहळ्यासाठी अटींचे पालन केले जाते. मात्र, इतर हॉलमध्ये वर आणि वधू त्यांच्या कुटुंबीयांच्या जबाबदारीवर लग्नसोहळे थाटात पार पाडत आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी येऊ नये यासाठी तडजोडीचा मार्ग अवलंबला जातो.

अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी गर्दी करून सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात आहेत. शहरातील महत्त्वाचे मॅरेज हॉल आजही गर्दीने फुललेले दिसत आहेत. यासंदर्भात कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलीसही गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल करीत आहेत. हीच परिस्थिती बदलापुरात निर्माण झाली आहे.

--------------------

हॉटेलमधील कार्यक्रमाला गर्दी

अंबरनाथच्या जांभूळ भागात असलेल्या एस.थ्री पार्क या हॉटेलमध्ये गुरुवारी सायंकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. शेट्टी समाज बंड मुंबई कमिटीने या ठिकाणी गेट टूगेदर आयोजित केले होते. या कार्यक्रमाला १५० जणांची उपस्थिती होती. शिवाय कोरोना नियमांची येथे पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे याची दखल घेत हॉटेल मॅनेजर आणि आयोजकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.