शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील उल्हासनदी पात्रात होतो लग्नसोहळ्याचा थाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:12 IST

कृषिपर्यटन, हॉटेल, रिसॉर्ट मालकांवर स्थानिकांनी केली कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातून वाहत असलेल्या उल्हास नदीचा वापर लग्नसोहळ्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वापर नेरळ जवळ असलेल्या नदी काठी वसलेल्या कृषी पर्यटन-हॉटेल व्यावसायिक-रिसॉर्ट मालक यांच्या माध्यमातून सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी पर्यटन-हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट मालकांवर करवाईची स्थानिकांकडून मागणी होत आहे. तर उल्हास नदीच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  सगळीकडे लग्नसराईची धाम धूम सुरू आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाकडून लग्नसोहळ्यासाठी नियम घालून दिले असले तरी हे नियम सर्वच ठिकाणी पालन होत नसल्याचे चित्र समोर येत आहेत. तर उपस्थितांच्या समोर राजेशाही थाट पद्धतीने लग्न सोहळे पार पाडण्यासाठी वधू-वराच्या घरच्या मंडळींकडून अमाप पैसे खर्च केले जात असून,आपलाच सोहळा इतरांपेक्षा वेगळा कसा हे देखील दाखवले जात आहे.     एकीकडे लग्न सोहळ्यासाठी फार्म हाऊस, हॉटेल मालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत ग्राहकांना आमिष दाखवण्याचे काम करत आहेत. यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील उल्हास नदी काठावरील व्यावसायिकांनी चक्क नदीचा वापर करून नदीकाठ रोषणाईने सजवण्यात आला आहे.  पाण्यात लग्न सोहळ्याचे मंडप थाटले असून,नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रशासन,पाटबंधारे विभाग पोलीस यंत्रणा यांच्या डोळ्यात धूळ फेकत लाखो रुपये हे व्यावसायिक कमविण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.    एकीकडे उल्हास नदी संवर्धनासाठी बचाव समित्या कार्यरत आहेत. हजारो गाव वाड्या व लाखोंच्या संख्येने जीवांची तहान भागवणाऱ्या या उल्हास नदीत दूषित पाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीने जागा काबीज केली आहे. यामुळे उल्हास नदीचे पाणी दूषित होत असल्याचे चित्र समोर असताना, आता लग्न सोहळ्यासाठी या नदीचा विनापरवाना वापर होत असल्याने, तालुक्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.      त्यातूनच तालुक्यातून नदीतीरावर वसलेल्या हॉटेल, कृषी व्यावसायिकांकडून नदीत थाटले जाणारे लग्न सोहळे यांच्यावर संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणार का? की याच व्यावसायिकांकडून संबंधित अधिकारी वर्गाचे हात तर ओले करण्यात आले नाहीत ना? असा प्रश्न स्थानिकांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.