शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रास्ता, पानी नहीं, कैसे जिऐंगे ?

By admin | Updated: May 6, 2017 05:46 IST

कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती

रोहिदास पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव : कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना शहरातील शांतीनगरात घडल्याने मुस्लिम महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. सहा महिन्यांतच रस्ते खराब होत असतील, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्नही या महिलांनी विचारला आहे. शहरातील गैबीनगर, शांतीनगर, कोंबडपाडा हाबहुतांश मुस्लिमबहुल परिसर म्हणजे समस्यांचे आगार झाले आहे. भिवंडीत पाण्याची समस्या गंभीर आहे. अण्णा भाऊ साठेनगरात १५ दिवसांनी पाणी येते. वितरणामधील दोषामुळे योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. पाइपलाइनच्या ठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे त्यातसांडपाणी शिरत असल्याने आमच्या नशिबी हे दूषित पाणी वापरण्याशिवाय गत्यंतर नाही, असे या महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियानासाठी आवाहन करत असताना शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. नाकांवर रूमाल ठेवल्याशिवाय चालताच येत नाही, असे या महिला म्हणाल्या. स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे नुसते घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे या महिलांनी आवर्जून सांगितले. पालिकेने नालेसफाईला सुरुवात केलेली नाही. शहरात १५ आरोग्य केंदे्र आहेत. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी राहतही नाहीत. परिणामी, रात्रीअपरात्री रुग्णाला आणले तर योग्य सुविधा मिळत नाहीत. याविषयी अनेक तक्रारी करूनही आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.ट्रिपल तलाक पद्धत बंद व्हायला हवीट्रिपल तलाकमहिलांच्यादृष्टीने अन्यायकारक आहे. एखादा पुरु ष आपल्या पहिल्या पत्नीशी तलाक घेतो आणि संसारात विघ्न आणतो. तो दुसऱ्या स्त्रीसोबत सुखाने संसार करणार नाही. त्यामुळे तोंडी तलाक प्रथा बंद करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या प्रवीण फारूक कणूल यांनी व्यक्त केले. स्थानिक समस्येवरही त्यांनी जोरदार टीकास्त्र केले. रस्त्यात वाहन अडकल्यामुळे महिलेला रु ग्णालयात वेळेवर पोहोचता आले नाही. शांतीनगरमध्ये महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. यासारखा दुसरा दुर्दैवी प्रकार असूच शकत नाही. प्रशासन आणि नगरसेवक याकडे लक्ष देणार कधी, असे त्यांनी विचारले.शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. पाणी, आरोग्य, गटारांचा प्रश्न सुटलेला नाही. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.- नरसीन खान, पिराणीपाडा रस्ते, पाणी, स्वच्छता हे प्रश्न गंभीर आहेत. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागतो. नगरसेवक, पालिकेने याकडे लक्ष देत त्या सोडवणे आवश्यक आहे.- वाजेदा तबस्सुम मोमीन, शांतीनगरपालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, ती आपली जबाबदारी नाही, अशा पद्धतीने वागत आहेत, हे चुकीचे आहे. नागरी सुविधांसाठी नागरिकांनीच आवाज उठवायला हवा. - जोहरांनी मोईद्दीन शेख, कोंबडपाडा