शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

रास्ता, पानी नहीं, कैसे जिऐंगे ?

By admin | Updated: May 6, 2017 05:46 IST

कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती

रोहिदास पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव : कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना शहरातील शांतीनगरात घडल्याने मुस्लिम महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. सहा महिन्यांतच रस्ते खराब होत असतील, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्नही या महिलांनी विचारला आहे. शहरातील गैबीनगर, शांतीनगर, कोंबडपाडा हाबहुतांश मुस्लिमबहुल परिसर म्हणजे समस्यांचे आगार झाले आहे. भिवंडीत पाण्याची समस्या गंभीर आहे. अण्णा भाऊ साठेनगरात १५ दिवसांनी पाणी येते. वितरणामधील दोषामुळे योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. पाइपलाइनच्या ठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे त्यातसांडपाणी शिरत असल्याने आमच्या नशिबी हे दूषित पाणी वापरण्याशिवाय गत्यंतर नाही, असे या महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियानासाठी आवाहन करत असताना शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. नाकांवर रूमाल ठेवल्याशिवाय चालताच येत नाही, असे या महिला म्हणाल्या. स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे नुसते घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे या महिलांनी आवर्जून सांगितले. पालिकेने नालेसफाईला सुरुवात केलेली नाही. शहरात १५ आरोग्य केंदे्र आहेत. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी राहतही नाहीत. परिणामी, रात्रीअपरात्री रुग्णाला आणले तर योग्य सुविधा मिळत नाहीत. याविषयी अनेक तक्रारी करूनही आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.ट्रिपल तलाक पद्धत बंद व्हायला हवीट्रिपल तलाकमहिलांच्यादृष्टीने अन्यायकारक आहे. एखादा पुरु ष आपल्या पहिल्या पत्नीशी तलाक घेतो आणि संसारात विघ्न आणतो. तो दुसऱ्या स्त्रीसोबत सुखाने संसार करणार नाही. त्यामुळे तोंडी तलाक प्रथा बंद करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या प्रवीण फारूक कणूल यांनी व्यक्त केले. स्थानिक समस्येवरही त्यांनी जोरदार टीकास्त्र केले. रस्त्यात वाहन अडकल्यामुळे महिलेला रु ग्णालयात वेळेवर पोहोचता आले नाही. शांतीनगरमध्ये महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. यासारखा दुसरा दुर्दैवी प्रकार असूच शकत नाही. प्रशासन आणि नगरसेवक याकडे लक्ष देणार कधी, असे त्यांनी विचारले.शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. पाणी, आरोग्य, गटारांचा प्रश्न सुटलेला नाही. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.- नरसीन खान, पिराणीपाडा रस्ते, पाणी, स्वच्छता हे प्रश्न गंभीर आहेत. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागतो. नगरसेवक, पालिकेने याकडे लक्ष देत त्या सोडवणे आवश्यक आहे.- वाजेदा तबस्सुम मोमीन, शांतीनगरपालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, ती आपली जबाबदारी नाही, अशा पद्धतीने वागत आहेत, हे चुकीचे आहे. नागरी सुविधांसाठी नागरिकांनीच आवाज उठवायला हवा. - जोहरांनी मोईद्दीन शेख, कोंबडपाडा