शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

पाणीपट्टी दरवाढ बेकायदा?

By admin | Updated: April 21, 2016 02:15 IST

मीरा भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा - शिवसेना - बविआ युतीने गेल्या वर्षापासून पाणीपट्टीची दरवाढ लादली.

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा - शिवसेना - बविआ युतीने गेल्या वर्षापासून पाणीपट्टीची दरवाढ लादली. त्याची नागरिकांकडून चालवलेली वसुली बेकायदा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरवाढीसह नवीन नळजोडणीच्या शुल्कवाढीचा ठराव २० फेब्रुवारीपूर्वी महासभेने मंजूर करणे आवश्यक होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी ३० मार्च २०१५ मध्ये दरवाढीचा ठराव केला. या बाबत मनसेची तक्र ार आल्यावर आता मुख्य लेखापरीक्षक यांनीही पाणी पुरवठा विभागास तपशील सादर करण्यास सांगितले आहे. निवासी वापरासाठी पालिका प्रती हजार लिटर पाण्यासाठी सात रु पये आकारात असताना सत्ताधाऱ्यांनी त्यात वाढ करून ती १० रु पये केली. तर वाणिज्य वापरासाठीचा २८ रु पये प्रती हजार लिटर असलेला पाण्याचा दर थेट ४० रु पये प्रती हजार लिटर केला. शिवाय नवीन नळजोडणीच्या शुल्कातही वाढ करण्यात आली. घरगुती नवीन अर्धा इंचाच्या नळजोडणीचे शुल्क १५ हजारावरून थेट ३० हजार करण्यात आले. तर एक इंचासाठीचे शुल्क २५ हजारावरून थेट ५० हजार केले. वाणिज्य वापरासाठीच्या नवीन अर्धा इंच नळजोडणीसाठी १५ हजारावरून ४५ हजार तर एक इंचासाठी २५ हजारवरून तब्बल ७५ हजार शुल्क आकारण्यास सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिली. पाणीपट्टी दरात व नवीन जोडणी शुल्कात भरमसाठ दरवाढीचा ठराव भाजपाच्या नरेंद्र मेहता यांनी मांडला होता व त्यास शिवसेनेच्या प्रशांत दळवी यांनी अनुमोदन दिले होते. या दरवाढीस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. परंतु भाजपा, सेना, बविआ युतीकडे बहुमत असल्याने दरवाढीचा ठराव मंजूर झाला. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दर व करवाढीची मंजुरी २० फेब्रुवारीपर्यंत घेणे बंधनकारक आहे. तसे असताना पालिकेने ३० मार्च २०१५ मध्ये त्यास मंजुरी दिल्याने हा ठरावच बेकायदा आहे. त्यामुळे पालिका नागरिकांकडून वाढीव दराने करत असलेली पाणीपट्टीची वसुली चुकीची आहे. त्यामुळे ती त्वरित रद्द करून केलेली वाढीव पाणीपट्टीची रक्कम नागरिकांना परत करण्याची मागणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अरु ण कदम, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुलतान पटेल यांनी केली. पालिकेने दरवाढ रद्द न केल्यास सरकारकडे दाद मागू असे कदम म्हणाले. या प्रकरणी मुख्य लेखापरीक्षक भागवत मुरकुटे यांनीदेखील पाणीपुरवठा विभागाकडून सविस्तर तपशील मागवला आहे.