शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

टँकरने पाण्याचा मारा; पालिकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:56 IST

शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कल्याण रोडवर मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी करूनही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता बनवलेला नाही.

भिवंडी : शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कल्याण रोडवर मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी करूनही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता बनवलेला नाही. त्यामुळे या अशा रस्त्यामधून उडणाºया धुळीने येथील व्यापारी व रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून टँकरने रस्त्यावर पाणीफवारणी करत आहेत.शहरातील राजीव गांधी ते कल्याण रोड साईबाबा बायपास या मार्गावर काँक्रिटचा रस्ता बनवणे आणि उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात हा रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने ठिकठिकाणी खड्डे झाले होते. दरम्यान, उड्डाणपुलाचेही काम सुरूआहे.त्यामुळे काँक्रिटचा रस्ता बनवण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या रस्त्यावर डांबराचे पॅच मारून खड्डे बुजवणे आणि वाहने चालवण्यायोग्य रस्ता बनवण्यासाठी ८० लाख रुपये एमएमआरडीएमार्फत खर्च केल्याचे सांगितले जाते. परंतु, हे काम योग्य रीतीने न झाल्याने मोठ्या प्रमाणात माती व खडीचे साम्राज्य पसरले. तसेच नादुरुस्त रस्ता अधिक त्रासदायक होऊन त्यामधून धूळ उडणे सुरू झाले आहे. या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांना कोंडीबरोबर रस्त्यावर साचलेल्या धुळीचा सामना करावा लागत आहे.वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. तर, काही नागरिक व व्यापारी आजारी पडले आहेत. महापालिकेने हा रस्ता दुरुस्त करावा, याबाबत नागरिकांसह सामाजिक सेवा संस्थांनी महापालिकेस लेखी पत्र दिले आहे. मात्र, हा रस्ता एमएमआरडीएकडे असल्याने पालिका प्रशासन हा रस्ता दुरुस्त करू शकत नाही, असे सांगून पालिकेने हात वर केले आहेत.पालिकेचे एमएमआरडीएला पत्रही बाब आयुक्त मनोहर हिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांच्या मागणीवरून धूळ उडू नये, म्हणून दररोज एका टँकरमधून या रस्त्यावर पाणी टाकले जाते. तसेच हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, याबाबत आयुक्तांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना लेखी पत्र दिले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी