शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

टँकरने पाण्याचा मारा; पालिकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:56 IST

शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कल्याण रोडवर मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी करूनही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता बनवलेला नाही.

भिवंडी : शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कल्याण रोडवर मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी करूनही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता बनवलेला नाही. त्यामुळे या अशा रस्त्यामधून उडणाºया धुळीने येथील व्यापारी व रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून टँकरने रस्त्यावर पाणीफवारणी करत आहेत.शहरातील राजीव गांधी ते कल्याण रोड साईबाबा बायपास या मार्गावर काँक्रिटचा रस्ता बनवणे आणि उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात हा रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने ठिकठिकाणी खड्डे झाले होते. दरम्यान, उड्डाणपुलाचेही काम सुरूआहे.त्यामुळे काँक्रिटचा रस्ता बनवण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या रस्त्यावर डांबराचे पॅच मारून खड्डे बुजवणे आणि वाहने चालवण्यायोग्य रस्ता बनवण्यासाठी ८० लाख रुपये एमएमआरडीएमार्फत खर्च केल्याचे सांगितले जाते. परंतु, हे काम योग्य रीतीने न झाल्याने मोठ्या प्रमाणात माती व खडीचे साम्राज्य पसरले. तसेच नादुरुस्त रस्ता अधिक त्रासदायक होऊन त्यामधून धूळ उडणे सुरू झाले आहे. या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांना कोंडीबरोबर रस्त्यावर साचलेल्या धुळीचा सामना करावा लागत आहे.वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. तर, काही नागरिक व व्यापारी आजारी पडले आहेत. महापालिकेने हा रस्ता दुरुस्त करावा, याबाबत नागरिकांसह सामाजिक सेवा संस्थांनी महापालिकेस लेखी पत्र दिले आहे. मात्र, हा रस्ता एमएमआरडीएकडे असल्याने पालिका प्रशासन हा रस्ता दुरुस्त करू शकत नाही, असे सांगून पालिकेने हात वर केले आहेत.पालिकेचे एमएमआरडीएला पत्रही बाब आयुक्त मनोहर हिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांच्या मागणीवरून धूळ उडू नये, म्हणून दररोज एका टँकरमधून या रस्त्यावर पाणी टाकले जाते. तसेच हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, याबाबत आयुक्तांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना लेखी पत्र दिले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी