शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जलवाहिनीची गळती अजूनही आहे सुरूच

By admin | Updated: April 21, 2016 02:09 IST

पालघर व २६ गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्यास्थित एअरवॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर पाणी गळती होऊन पाणी वाया जात

पालघर/ नंडोरे : पालघर व २६ गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्यास्थित एअरवॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असल्याचे लोकमतने अलीकडेच निदर्शनास आणून दिले तरी जीवनप्राधिकरण तसेच या योजनेचा लाभ घेणारे पालघर नगरपरिषद व पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच या पाणीपुरवठा अंतर्गत वाघोबा मंदिरापासून रस्त्याच्या समांतर जाणारी जलवाहिनी अनेक ठिकाणी जीर्ण होऊन फुटलेली असून या तिला ही गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्यास फुरसत नसल्याचे दिसून येत आहे.वाघोबा मंदिरापासून पुढे जाताना रस्त्याच्या समांतर असलेल्या जलवाहिनीस एअरवॉल्व्ह जोडलेला आहे. त्या ठिकाणीची जोडणी जीर्ण झाली असून तिला छिद्रे पडल्याने जलवाहिनीतील दबावामुळे हे पाणी या छिद्रातून बाहेर पडून मोठ्या प्रमाणत गळती होत आहे. पुढे याच रस्त्याच्या कडेला अशाच प्रकारचा आणखी एक एअरव्हॉल्व्ह जीर्ण होऊन त्यातून पाणी वाया जाऊन गळती होत आहे. ही प्रचंड पाणीगळती पाहून येथून ये-जा करणारे लोकही अस्वस्थ होतात. पुढे मासवणपर्यंतही असेच एअरवॉल्व्ह बसविलेले असून काही जीर्ण झाल्यामुळे त्यातून पाणी गळती होताना दिसत आहे.शेलवली जलशुद्धिकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवणारी जलवाहिनी याच केंद्राच्या समांतर काही अंतरावर एका ठिकाणी पूर्णत: गंजून गेली आहे. या गंजलेल्या ठिकाणी ही जलवाहिनी फाटली आहे. पाण्याच्या जोरदार दबावामुळे त्या ठिकाणी पाणी गळती होत आहे. ही जलवाहिनी व एअरवॉल्व्हची वारंवार चाचणी करून ते दुरूस्त करणे अपेक्षित असताना या गंभीर बाबींकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ही जलवाहिनी व हे एअरवॉल्व्ह असेच नादुरूस्त राहिले तर प्रसंगी जलवाहिनी फुटू शकते. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे व ही पाणीगळती थांबविण्यासाठी योग्य ती उपाययोजना झाली पाहिजे. अलीकडेच जिल्ह्यात शासनामार्फत जलसप्ताह साजरा करण्यात आला. जिल्ह्यात साजरा झालेल्या या जलसप्ताहात लघु पाटबंधारे विभागासह जीवन प्राधिकरणा आदी सर्व यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. या जलसप्ताहात जनतेला पाणी बचतीचे धडे देण्यात आले. जनतेला धडे देणाऱ्या या यंत्रणेला पाणी बचतीचे महत्व कोणी शिकवावे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.(वार्ताहर)