शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भरपावसात दिवसाआड उल्हासनगरला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:49 IST

पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे

उल्हासनगर : पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. मात्र, पाणी वितरण योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने अमृत योजनेअंतर्गत ६० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली.मुबलक पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने राबवलेली पाणीवितरण योजना ३०० कोटींवर जाऊनही संपूर्ण शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यासाठी सिमेंंटचे धडधाकट रस्ते खोदण्यात आले आणि नंतर त्यांच्या दुरूस्तीवर पालिकेने ५० कोटीपेक्षा जास्त खर्च केला. अर्धवट योजनेमुळे भर पावसात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून दोनच दिवस पाणीपुरवठा होत आहे.विधानसभेत पाणीवितरण योजनेचा प्रश्न आमदार ज्योती कलानी यांनी उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश वर्षापूर्वी दिले. मात्र चौकशीचे पानही हलले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याची टीका सुरू आहे.