शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

आठ दिवसांपासून ठाण्यात पाणीबाणी; सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवार उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:15 IST

शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.

ठाणे : योग्य नियोजन केले असले तरी ठाण्यावर मागील आठ दिवसांपासून पाणीसंकट ओढवल्याची बाब समोर आली आहे. जुन्या ठाण्यातील प्रमुख भागांसह घोडबंदर परिसरातही आठ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागांमध्ये तर पाण्याचे वेळापत्रकच बिघडले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना धक्का लागून गळती सुरू झाल्यानेच ही समस्या ओढवल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तिची दुरुस्ती केल्यानंतर शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही स्पष्ट केले आहे.शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीकपातीचे संकट तूर्तास ओढवलेले नाही. मात्र, असे असले तरी दुरुस्तीसाठी काही महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. असे असतानाच आता आठ दिवसांपासून अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. शहरातील नौपाडा, चरई, सिद्धेश्वर टाकीवरून ज्याज्या भागांना पाणीपुरवठा होतो, तेते सर्व भाग तसेच इतर भागांतही पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. परंतु, काही भागांना रात्रीअपरात्री, तर काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.घोडबंदरवासीयांचे नियोजन कोलमडलेदुसरीकडे घोडबंदर भागातील ब्रह्मांड, वाघबीळ, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा आदी भागांनादेखील या पाणीबाणीचा फटका बसत आहे. रात्रीअपरात्री पाणी येत असल्याने नागरिकांना रात्रीचे जागरण करून ते भरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे सकाळी कामाला जाण्याचे नियोजनही कोलमडले आहे.महामार्गाच्या कामामुळे जलवाहिनीला गळतीयासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना छेडले असता, मागील आठ दिवसांपासून ही परिस्थिती ठाण्यातील अनेक भागांत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाºया १३०० मिमी व्यासाच्या पिसे धरणावरून येणाºया जलवाहिनीला रांजनोलीनाक्याजवळ मुख्य द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना धक्का लागून गळती सुरू झाली आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या खालून जात असल्याने तिची माहिती तत्काळ समजू शकली नाही. त्यानंतर, डिटेक्टर आणून या जलवाहिनीवर कुठे गळती आहे, याची माहिती घेतली. त्यानुसार, आता तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेतले आहे. ही दुरुस्ती झाल्यानंतर गुरुवारी कमी दाबाने शहराला पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, शुक्रवारपासून तो सुरळीत होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे