शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षापेक्षा तिप्पट पाणीसाठा

By admin | Updated: July 2, 2017 06:08 IST

सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तिप्पट वाढ झाली. बारवी धरणात मागील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात तिप्पट वाढ झाली. बारवी धरणात मागील वर्षी आजच्या दिवशी केवळ ७ टक्के असलेला पाणीसाठा शनिवारी ४२.१४ टक्के झाला. भातसातही ४५.७३ टक्के, तर उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणातील पाणीसाठा ५ टककयावरून २५.७१ टक्के झाला आहे. धरण क्षेत्रात पाच हजार ४२५ मिमी पाऊस आजवर पडला. सरासरी ७७५ मिमी त्याची नोंद असून मागील वर्षी ती केवळ ४०६ मिमी होती. बारवीत ९८.२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. सुमारे ४२.१४ टक्के असलेला हा साठा मागील वर्षी केवळ ७.७ टक्के होता. भातसात मागील वर्षी २७.६५ टक्के असलेला साठा यंदा ४५.७३ टक्के आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ ५.४४ टक्के साठा होता, तो २५.७१ टक्के आहे. मोडक सागरमध्ये ९.९५ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ४७.२२ टक्के झाला. तानसातही ४७ टक्के पाणी आहे. याशिवाय बदलापूर बंधाऱ्यातील १७ घनमीटर पाणीसाठ्यापैकी १४ घनमीटर तयार झाला. याप्रमाणेच मोहने बंधाऱ्यातही १० घनमीटरपैकी ५.८० घनमीटर पाणीसाठा तयार आहे. पहिल्याच पावसाने पाणीटंचाईच्या समस्येला दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.