शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा केला बंद; नागरिकांचे होणार हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:09 IST

ऐन दिवाळीत टंचाईची शक्यता

अंबरनाथ : दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वाढत्या तक्रारींनंतर अंबरनाथच्या चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. पर्याय म्हणून एमआयडीसीचे पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर आणि परिसरात ५० हजार लोकवस्ती असलेल्या भागाला चिखलोली धरणामधून सहा दशलक्ष लीटर पाणी वितरित केले जाते. मात्र धरणातून होणारा पाणीपुरवठा दूषित आणि दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीवरून तूर्त चिखलोलीतून पाणी वितरण करण्याचे थांबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे कार्यकारी अभियंता एस. के. दशोरे यांनी सांगितले.

मागील वर्षापासून धरणाची उंची अडीच मीटरने वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. या वर्षी पावसाळ्यात चिखलोली धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते, पावसाळ्यात उंची वाढविण्याचे काम बंद होते, ते काम पुन्हा सुरू होईपर्यंत धरणातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी सर्वपक्षीयांनी लावून धरली होती. अखेर मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत विविध राजकीय पक्षांनी तक्रारी, आंदोलने केल्याने मंगळवारपासून पाणी वितरण बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे