शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

चिखलोली धरणातून १० ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:38 IST

मनसेचा पाठपुरावा; अंबरनाथ पूर्वेला दिलासा

अंबरनाथ : अंबरनाथचे चिखलोली धरण भरून वाहत असतानाही त्या धरणाचा पाणीपुरवठा बंद करून ठेवण्यात आला होता. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून १० आॅक्­टोबरपासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे.शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्णपणे भरलेले आहे. या धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जात नव्हता. धरणाचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मागील वर्षी पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसीकडून अंबरनाथ शहराला पाणी मिळत असले, तरी ते पुरेसे नसल्याने अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला प्रामुख्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १८ सप्टेंबरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यास अंबरनाथकरांना पुरेसे पाणी मिळेल, या हेतूने चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देऊन त्यानंतर धरणात आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. याची दखल घेत चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून चिखलोली धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने डागडुजीची गरज असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे १० आॅक्टोबरपासून धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले आहे....आंदोलन करणार!लोकहितासाठी आणखी पाच दिवस आम्ही वाट बघणार असून त्यानंतर जर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर १२ आॅक्टोबरला मनसे चिखलोली धरणात उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिला आहे.