शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

चिखलोली धरणातून १० ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:38 IST

मनसेचा पाठपुरावा; अंबरनाथ पूर्वेला दिलासा

अंबरनाथ : अंबरनाथचे चिखलोली धरण भरून वाहत असतानाही त्या धरणाचा पाणीपुरवठा बंद करून ठेवण्यात आला होता. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून १० आॅक्­टोबरपासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे.शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्णपणे भरलेले आहे. या धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जात नव्हता. धरणाचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मागील वर्षी पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसीकडून अंबरनाथ शहराला पाणी मिळत असले, तरी ते पुरेसे नसल्याने अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला प्रामुख्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १८ सप्टेंबरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यास अंबरनाथकरांना पुरेसे पाणी मिळेल, या हेतूने चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देऊन त्यानंतर धरणात आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. याची दखल घेत चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून चिखलोली धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने डागडुजीची गरज असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे १० आॅक्टोबरपासून धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले आहे....आंदोलन करणार!लोकहितासाठी आणखी पाच दिवस आम्ही वाट बघणार असून त्यानंतर जर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर १२ आॅक्टोबरला मनसे चिखलोली धरणात उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिला आहे.