शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘अतिधोकादायक’मधील ३० घरांचे पाणी तोडले, केडीएमसीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 01:24 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी ‘क’ व ‘फ’ प्रभागांतील अतिधोकादायक इमारतींमधील ३० सदनिकाधारकांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना घरे रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने दिली होती. तरीही, अनेक रहिवासी तेथेच राहत आहेत. त्यामुळे बोडके यांनी अतिधोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. वीजपुरवठा खंडित करण्याची बाब ‘महावितरण’कडे असल्याने त्यांच्या अधिकाºयांना तसेच सूचित केले आहे. मात्र, ‘महावितरण’कडून कारवाईचा तपशील मिळू शकलेला नाही. तर, पाणीपुरवठा विभागाने ‘क’ प्रभागातील लक्ष्मी इमारतीमधील १७ जणांचा, ‘फ’ प्रभागातील अतिधोकादायक इमारतींमधील १३ जणांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना इमारत रिकामी करणे भाग पडले आहे.धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे. तसेच इमारत वास्तव्यास अनुकूल असल्याचा दाखला महापालिका अभियंत्यांकडून मिळवावा. त्यानंतरच, त्यात वास्तव्य करावे, अन्यथा धोकादायक व अतिधोकादायक इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला आहे.जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिका इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी वीज व पाणी खंडित करत असली, तरी रहिवाशांना जायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे. महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नाही. केवळ दोनच ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. तेथे ५० जणांनाही पावसाळ्यात राहता येणार नाही. महापालिकेने जादा संक्रमण शिबिरे उभारण्याचा विचार कधीही केलेला नाही. घर सोडले तर बाहेर भाडे परवडणारे नाही. इमारत रिकामी केल्यावर महापालिका तिच्यावर हातोडा चालवणार, अशी भीती रहिवाशांना सतावत आहे. दुसरीकडे बिल्डर, मालक आणि भाडेकरू यांच्यात एकमत नाही. अनेक इमारतींमध्ये भाडेकरू राहत नाहीत. काही इमारती या मालकांच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या अधिकृततेविषयीची सत्यता महापालिकेने यापूर्वी कधीही पडताळून पाहिलेली नाही.दीर्घकालीन उपाययोजनांची गरजधोकादायक व अतिधोकादायक इमारतींत राहणाºया रहिवाशांच्या उरात पाऊस आला की, धडकी भरते. कारण, त्यांच्या विरोधातील कारवाईस महापालिका पावसाळ्यात सक्रिय होते. महापालिकेस त्यांच्या जीवाची काळजी आहे. पण, त्यांच्या पुनर्विकासाची काळजी नाही.पावसाळा संपल्यावर उर्वरित आठ महिन्यांत या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला जात नाही. कोणताही प्रशासक त्याविषयी दीर्घकालीन उपाय व पर्याय शोधत नाही.तो कायमस्वरूपी शोधला तर महापालिकेस पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची वेळच येणार नाही, अशी अपेक्षा धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, तोपर्यंत जीव टांगणीलाच आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका