शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

कल्याणसाठी पाणीटंचाई आराखडा

By admin | Updated: April 11, 2016 01:22 IST

कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील काळू, भातसा, उल्हास व बारवी या चार नद्यांवर गाव तेथे पाणीयोजना असतानाही तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क ४६ गावे

उमेश जाधव,  टिटवाळाकल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील काळू, भातसा, उल्हास व बारवी या चार नद्यांवर गाव तेथे पाणीयोजना असतानाही तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क ४६ गावे आणि ८५ पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी या वर्षी २ कोटी १८ लाख रु पयांचा टंचाई आराखडा पाणीपुरवठा विभागाला नुकताच सादर केला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी लाखो रु पये खर्च करूनही ग्रामस्थ आजही पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहेत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.काळू, उल्हास, भातसा व बारवी या चार नद्या तालुक्यातून वाहत आहेत. ४५ गावे नदीपासून हाकेच्या अंतरावर आहेत, तर २० पाडे नदीजवळ आहेत. मात्र, टंचाई आराखड्यात पाणीयोजना मंजूर झालेल्या गावांसाठी योजना दुरु स्तीकरिता निधीची तरतूद केली आहे. हा तालुका टँकरमुक्त असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांनी टंचाईच्या नावाने चांगभलं करण्यासाठी सहा गावे आणि तीन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ३ लाख रु पयांची तरतूद केली आहे. तसेच १० गावे आणि आठ पाड्यांमधील पाणीयोजना दुरुस्तीसाठी एक कोटी ४७ लाख रुपयांची व्यवस्था केली आहे. तर, बोअरवेल खोदण्यासाठी २६ गावे आणि ७४ पाड्यांसाठी २७ लाख रु पये मंजूर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी २७ बोअरवेल खोदण्यात आल्या होत्या, त्यापैकी अवघ्या दोन बोअरवेलना पाणी लागले. तेही मे महिन्यानंतर आटले. त्यामुळे शेकडो बोअरवेल आज बंद असताना नियोजन न करताच पाणीपुरवठा विभागाने तयार केलेला हा टंचाई आराखडा फसवा आहे, असा आरोप ग्रामस्थांचा आहे.