शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कल्याणसाठी पाणीटंचाई आराखडा

By admin | Updated: April 11, 2016 01:22 IST

कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील काळू, भातसा, उल्हास व बारवी या चार नद्यांवर गाव तेथे पाणीयोजना असतानाही तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क ४६ गावे

उमेश जाधव,  टिटवाळाकल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील काळू, भातसा, उल्हास व बारवी या चार नद्यांवर गाव तेथे पाणीयोजना असतानाही तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क ४६ गावे आणि ८५ पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी या वर्षी २ कोटी १८ लाख रु पयांचा टंचाई आराखडा पाणीपुरवठा विभागाला नुकताच सादर केला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी लाखो रु पये खर्च करूनही ग्रामस्थ आजही पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहेत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.काळू, उल्हास, भातसा व बारवी या चार नद्या तालुक्यातून वाहत आहेत. ४५ गावे नदीपासून हाकेच्या अंतरावर आहेत, तर २० पाडे नदीजवळ आहेत. मात्र, टंचाई आराखड्यात पाणीयोजना मंजूर झालेल्या गावांसाठी योजना दुरु स्तीकरिता निधीची तरतूद केली आहे. हा तालुका टँकरमुक्त असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांनी टंचाईच्या नावाने चांगभलं करण्यासाठी सहा गावे आणि तीन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ३ लाख रु पयांची तरतूद केली आहे. तसेच १० गावे आणि आठ पाड्यांमधील पाणीयोजना दुरुस्तीसाठी एक कोटी ४७ लाख रुपयांची व्यवस्था केली आहे. तर, बोअरवेल खोदण्यासाठी २६ गावे आणि ७४ पाड्यांसाठी २७ लाख रु पये मंजूर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी २७ बोअरवेल खोदण्यात आल्या होत्या, त्यापैकी अवघ्या दोन बोअरवेलना पाणी लागले. तेही मे महिन्यानंतर आटले. त्यामुळे शेकडो बोअरवेल आज बंद असताना नियोजन न करताच पाणीपुरवठा विभागाने तयार केलेला हा टंचाई आराखडा फसवा आहे, असा आरोप ग्रामस्थांचा आहे.