शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 22, 2017 01:23 IST

उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.

भार्इंदर : उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. पुरेसे पाणी उचलता येत नसल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अजून दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होतानाच रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मीरा-भार्इंदर शहराला स्टेमकडून पाणीपुरवठा होतो. उल्हास नदीतून ते पाणी उचलले जाते. पण या पुरवठ्याला जलप्रदूषणाचा फटका बसल्याने जांभूळ येथे स्टेमने नवी जलवाहिनी टाकून तेथूनच पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हा फरक पडल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले. स्टेममार्फत दररोज ८६ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्याचा मुख्य जलस्त्रोत उल्हास नदी असून नदीवर शहाड येथे बंधारा बांधण्यात आला आहे. तेथेच असलेल्या ८० फूट खोल विहिरीतून पाणी उचलले जाते. पुढे ते टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाते आणि वितरित केले जाते. परंतु, उल्हास नदीपात्रातील पाण्यावर २० मार्चपासून हिरव्या रंगाचा प्रदूषित तवंग येतो आहे. त्यामुळे स्टेमचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे. याबाबत चौकशी केल्यावर बंधऱ्याच्या वरच्या बाजुला दीड किलोमीटर अंतरावर जल प्रदूषण झाल्याचे निष्पन्न झाले. स्टेमने ती माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले. जलप्रदुषणामुळे कोणी बाधित झाल्याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी ३.३० वाजल्यापासुन रात्री ९ वाजेपर्यंंत ५.३० तास शहाडच्या पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहराला ३० एमएलडी पाणीपुरवठा कमी झाला. प्रदूषण निवळल्यानंतर तो सुरळीत होतो. मात्र त्याचा फटका मीरा-भाईंदरमधील पाणीपुरवठ्याला बसला. (प्रतिनिधी)