शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 22, 2017 01:23 IST

उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.

भार्इंदर : उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. पुरेसे पाणी उचलता येत नसल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अजून दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होतानाच रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मीरा-भार्इंदर शहराला स्टेमकडून पाणीपुरवठा होतो. उल्हास नदीतून ते पाणी उचलले जाते. पण या पुरवठ्याला जलप्रदूषणाचा फटका बसल्याने जांभूळ येथे स्टेमने नवी जलवाहिनी टाकून तेथूनच पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हा फरक पडल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले. स्टेममार्फत दररोज ८६ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्याचा मुख्य जलस्त्रोत उल्हास नदी असून नदीवर शहाड येथे बंधारा बांधण्यात आला आहे. तेथेच असलेल्या ८० फूट खोल विहिरीतून पाणी उचलले जाते. पुढे ते टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाते आणि वितरित केले जाते. परंतु, उल्हास नदीपात्रातील पाण्यावर २० मार्चपासून हिरव्या रंगाचा प्रदूषित तवंग येतो आहे. त्यामुळे स्टेमचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे. याबाबत चौकशी केल्यावर बंधऱ्याच्या वरच्या बाजुला दीड किलोमीटर अंतरावर जल प्रदूषण झाल्याचे निष्पन्न झाले. स्टेमने ती माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले. जलप्रदुषणामुळे कोणी बाधित झाल्याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी ३.३० वाजल्यापासुन रात्री ९ वाजेपर्यंंत ५.३० तास शहाडच्या पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहराला ३० एमएलडी पाणीपुरवठा कमी झाला. प्रदूषण निवळल्यानंतर तो सुरळीत होतो. मात्र त्याचा फटका मीरा-भाईंदरमधील पाणीपुरवठ्याला बसला. (प्रतिनिधी)