शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पाणी टंचाई, आमदार कुमार आयलानी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2023 18:43 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उल्हासनगर : शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन, महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयलानी यांनी घेऊन निर्देश दिले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील खेमानी परिसर, सुभाष टेकडी, गायकवाड पाडा, महादेवनगर, संतोषनगर, कैलास कॉलनी, गणेशनगर, ओटी सेक्शन भीमनगर, मराठा सेक्शन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. परिसरातील नागरिक पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभाग व आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात जात आहेत. अखेर आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी आमदार कार्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्यासह भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी उपस्थित होते. महापालिकेला एमआयडीसी कडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली. 

शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, उंच जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने, शेवटच्या घरा पर्यंत पाणी पोहचत नाही. अशी कबुली यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलवाहिणीला गळती लागल्याने, जलवाहिणीला पाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आहे. जलवाहिनी गळती दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. असे संकेतही अधिकाऱ्यांनी दिले. आमदार कुमार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा वितरण अनियमित होत असल्याचे सांगितले. काही भागात दिवसाला दोन वेळा तर काही भागाला दिवसातून अर्धा तासही पाणी येत नसल्याचे सांगितले. पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याचे आदेश आयलानी यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. 

जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू 

ज्या विभागात व परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. अश्या विभागात नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम महापालिका पाणी पुरवठा विभागाने सुरू केले. तसेच जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून इएमआयडीसीला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे पत्र दिले. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.