शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

उल्हासनगरात पाणी टंचाई, आमदार कुमार आयलानी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2023 18:43 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उल्हासनगर : शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन, महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयलानी यांनी घेऊन निर्देश दिले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील खेमानी परिसर, सुभाष टेकडी, गायकवाड पाडा, महादेवनगर, संतोषनगर, कैलास कॉलनी, गणेशनगर, ओटी सेक्शन भीमनगर, मराठा सेक्शन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. परिसरातील नागरिक पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभाग व आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात जात आहेत. अखेर आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी आमदार कार्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्यासह भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी उपस्थित होते. महापालिकेला एमआयडीसी कडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली. 

शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, उंच जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने, शेवटच्या घरा पर्यंत पाणी पोहचत नाही. अशी कबुली यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलवाहिणीला गळती लागल्याने, जलवाहिणीला पाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आहे. जलवाहिनी गळती दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. असे संकेतही अधिकाऱ्यांनी दिले. आमदार कुमार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा वितरण अनियमित होत असल्याचे सांगितले. काही भागात दिवसाला दोन वेळा तर काही भागाला दिवसातून अर्धा तासही पाणी येत नसल्याचे सांगितले. पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याचे आदेश आयलानी यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. 

जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू 

ज्या विभागात व परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. अश्या विभागात नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम महापालिका पाणी पुरवठा विभागाने सुरू केले. तसेच जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून इएमआयडीसीला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे पत्र दिले. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.