शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

उल्हासनगरात पाणी टंचाई, आमदार कुमार आयलानी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2023 18:43 IST

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उल्हासनगर : शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन, महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयलानी यांनी घेऊन निर्देश दिले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील खेमानी परिसर, सुभाष टेकडी, गायकवाड पाडा, महादेवनगर, संतोषनगर, कैलास कॉलनी, गणेशनगर, ओटी सेक्शन भीमनगर, मराठा सेक्शन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. परिसरातील नागरिक पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभाग व आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात जात आहेत. अखेर आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी आमदार कार्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्यासह भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी उपस्थित होते. महापालिकेला एमआयडीसी कडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली. 

शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, उंच जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने, शेवटच्या घरा पर्यंत पाणी पोहचत नाही. अशी कबुली यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलवाहिणीला गळती लागल्याने, जलवाहिणीला पाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आहे. जलवाहिनी गळती दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. असे संकेतही अधिकाऱ्यांनी दिले. आमदार कुमार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा वितरण अनियमित होत असल्याचे सांगितले. काही भागात दिवसाला दोन वेळा तर काही भागाला दिवसातून अर्धा तासही पाणी येत नसल्याचे सांगितले. पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याचे आदेश आयलानी यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. 

जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू 

ज्या विभागात व परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. अश्या विभागात नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम महापालिका पाणी पुरवठा विभागाने सुरू केले. तसेच जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून इएमआयडीसीला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे पत्र दिले. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.