शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

बारकूपाडा भागात महिन्याभरापासून पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

अंबरनाथ : पालिका निवडणूक तोंडावर असताना आता पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा भागात नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक ...

अंबरनाथ : पालिका निवडणूक तोंडावर असताना आता पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा भागात नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक उमेदवार स्वतः पाणीपुरवठा बंद करून नंतर तो पुन्हा सुरू करीत आहेत. आपण पाण्याची समस्या सोडवली हे दाखविण्यासाठी इच्छुक उमेदवार हा प्रयत्न करीत आहेत. या राजकीय खेळीमुळे स्थानिक नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून अंबरनाथ शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एमआयडीसीकडून जीवन प्राधिकरणाला जो पाणीपुरवठा केला जातो त्यात काही प्रमाणात कपात झाल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, आता पाणीटंचाईला केवळ जीवन प्राधिकरण किंवा एमआयडीसी जबाबदार राहिले नसून आता राजकीय हस्तक्षेपामुळेही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अंबरनाथमधील बारकूपाडा गाव. या गावात गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. ही पाणीटंचाई राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी होत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरात निवडणुकीचे वातावरण असल्याने नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्वमनला हाताशी धरून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे, असा आरोप खुद्द माजी नगरसेविका अनिता भोईर यांनी केला आहे. एखाद्या विभागामध्ये इच्छुक उमेदवारांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यास ते इच्छुक त्या भागातील नागरिकांना अप्रत्यक्ष त्रास देण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

------------------------------------

कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी निर्माण केलेली ही पाणीटंचाई नागरिकांना मात्र त्रासदायक ठरली आहे. बारकूपाडामधील या पाणीटंचाईच्या विरोधात स्थानिक महिलांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची ही परिस्थिती केवळ बारकूपाडापुरती मर्यादित नसून शिवगंगानगर भागातही निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.