शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बारकूपाडा भागात महिन्याभरापासून पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

अंबरनाथ : पालिका निवडणूक तोंडावर असताना आता पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा भागात नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक ...

अंबरनाथ : पालिका निवडणूक तोंडावर असताना आता पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा भागात नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक उमेदवार स्वतः पाणीपुरवठा बंद करून नंतर तो पुन्हा सुरू करीत आहेत. आपण पाण्याची समस्या सोडवली हे दाखविण्यासाठी इच्छुक उमेदवार हा प्रयत्न करीत आहेत. या राजकीय खेळीमुळे स्थानिक नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून अंबरनाथ शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एमआयडीसीकडून जीवन प्राधिकरणाला जो पाणीपुरवठा केला जातो त्यात काही प्रमाणात कपात झाल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, आता पाणीटंचाईला केवळ जीवन प्राधिकरण किंवा एमआयडीसी जबाबदार राहिले नसून आता राजकीय हस्तक्षेपामुळेही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अंबरनाथमधील बारकूपाडा गाव. या गावात गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. ही पाणीटंचाई राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी होत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरात निवडणुकीचे वातावरण असल्याने नागरिकांना आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुक उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्वमनला हाताशी धरून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे, असा आरोप खुद्द माजी नगरसेविका अनिता भोईर यांनी केला आहे. एखाद्या विभागामध्ये इच्छुक उमेदवारांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यास ते इच्छुक त्या भागातील नागरिकांना अप्रत्यक्ष त्रास देण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

------------------------------------

कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी निर्माण केलेली ही पाणीटंचाई नागरिकांना मात्र त्रासदायक ठरली आहे. बारकूपाडामधील या पाणीटंचाईच्या विरोधात स्थानिक महिलांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची ही परिस्थिती केवळ बारकूपाडापुरती मर्यादित नसून शिवगंगानगर भागातही निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.