शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई ?; पाणीपुरवठा विभागाचे कानांवर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:56 IST

बिल थकले

उल्हासनगर :  महापालिकेने सात महिन्यांपासून एमआयडीसीचे पाणीबिल दिले नसल्याने ऐन दिवाळीत पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे महापालिकेने पाणीबिल दिले नसल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी दिली. तर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एम. सोनवणे यांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसी शहराला दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा करत असून महिन्याला महापालिका पाणीबिलापोटी अडीच कोटींचे बिल देते. शहरातील पाणीगळती, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जलकुंभ न भरणे, अनियमित पाणीपुरवठा आदींमुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठा सेक्शन परिसरातील नागरिक, मनसे गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

पाणीटंचाईने नागरिक ऐन दिवाळीत त्रस्त असताना महापालिकेने एप्रिलपासून पाणीबिल दिले नसल्याचे उघड झाले आहे. पाणीबिल वेळेत व नियमित दिले जात नसल्याने एमआयडीसी कधी व केव्हाही पाणीकपात करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून एलबीटी अनुदानाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत ठप्प पडले आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एम. सोनवणे यांना एमआयडीसीचे पाणीबिल दिले की नाही, याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने, विभागाचे काम रामभरोसे सुरू असल्याची टीका होत आहे. मुख्य लेखा अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पाण्याचे बिल एप्रिलपासून दिले नसल्याची माहिती दिली. तसेच कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस दिल्यानंतर पगार देणार असल्याचे संकेत दिले. लॉकडाऊन कालावधीतील सात महिन्यांत मालमत्ता व पाणीपुरवठाकर विभागातून पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न मिळाले. तसेच नगररचनाकार विभागाला नगररचनाकार मिळाल्यानंतरही उत्पन्न ठप्प असून इतर विभागाची स्थिती जैसे थे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर