शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

जिल्ह्यात ४२१ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 16, 2017 04:30 IST

जिल्ह्यातील ४२१ गावपाड्यांत एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. शहापूरच्या कसारा परिसरात गुरुवारी पाण्यासाठी एकाला जीव गमवावा लागला आहे.

- सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील ४२१ गावपाड्यांत एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. शहापूरच्या कसारा परिसरात गुरुवारी पाण्यासाठी एकाला जीव गमवावा लागला आहे. या जीवघेण्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने दोन कोटी ४६ लाख ५१ हजार रुपये खर्चाचे नियोजन केले असले, तरी जिल्हा परिषदेच्या निष्काळजी व वेळकाढूपणामुळे या उपाययोजना अद्यापही कागदावरच आहेत. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.निवडणुकीअभावी जिल्हा परिषदेवर सुमारे पाच वर्षांपासून प्रशासक राज आहे. अधिकाऱ्यांच्या मर्जीतून कामकाज सुरू आहे. कोणत्याही विकासकामांसंदर्भात साधी कुजबूजही बाहेर येऊ न देता बिनदिक्कत कामकाज सुरू आहे. काही महिने आधीच दोन कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली असती, तर पाण्यासाठी धडपडणाऱ्या कसाऱ्याजवळील ग्रामस्थांच्या जीवावर बेतले नसते, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, बारवी, मोरबे, पिसे यासारख्या मोठ्या जलाशयांजवळ राहूनही ग्रामीण जनतेला त्यातील पाणी पिण्याचा हक्क नाही. त्यात अधिकारी, प्रशासकांचा मनमर्जीचा कारभार ग्रामीण जनतेच्या जीवावर उठल्याचा आरोप होत आहे. या तहानलेल्या गावखेड्यांच्या पाणीटंचावरील उपाययोजनेवर दरवर्षी कोटीकोटींचा खर्च होऊनही पाण्यासाठी जीव गमवावे लागत आहेत. यंदाही टँकर, विंधन विहिरी, जुन्या नळयोजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळयोजना आदी कामे करून सुमारे ४२१ गावपाड्यांमधील पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीचा २ कोटी ४६ लाख ५१ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार कागदावर असल्यामुळे गावखेड्यांत उन्हामुळे होरपळत असून पाण्यावाचून तळमळत आहेत. नियोजन तयार - जिल्हाभरातील ९५ गावांसह ३२६ आदिवासीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या दृष्टीने खर्चाचे नियोजन आहे. मागील वर्षी १५३ गावांच्या टंचाईवर मात करण्यासाठी २३ टँकरने २४ तास पाणीपुरवठा केला. २० जूनला जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे काहीअंशी टंचाईला पूर्णविराम मिळाला होता. - यंदा ५९ गावे आणि १५८ पाड्यांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन कागदावर आहे. त्यासाठी ९७ लाख ४१ हजारांचा खर्च निश्चित केला आहे. - शहापूरच्या तीन गावांमधील नळपाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २८ लाख ५० हजार रुपये खर्चाचे नियोजन आहे. ३३ गावे आणि १६८ पाड्यांमध्ये नवीन विंधन विहिरींच्या कामासाठी एक कोटी २० लाख ६० हजारांचा खर्च निश्चित केला आहे. तालुक्यातील १७१ गावांच्या टंचाईसाठी एक कोटी २३ लाख ७० हजार खर्चाचे नियोजन आधीच केले आहे. - मुरबाड तालुक्यातील ७० गावांमध्ये ५८ लाख ३९ हजाररुपये खर्चाची कामे हाती घेतली आहेत. ही कामे करचोंडे, डोंगरन्हावे, तुळई, पाटगाव, पोटगाव, मुहगड, सिद्धगडला होणार आहेत. - भिवंडी तालुक्यात सात गावे, ५९ पाड्यांमध्ये ४१ लाखांच्या कामांचे नियोजन आहे. - कल्याणमधील नऊ गावे आणि १५ पाड्यांमध्ये १३ लाखांची पाणीसमस्येसंबंधी कामे आहेत. - अंबरनाथ तालुक्याच्या १७ गावपाड्यांमध्ये १० लाखांची कामे आदी पाणीटंचाईवरील उपाययोजना केवळ कागदावर ठेवून जिल्हा प्रशासन ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळत असल्याच्या भावना विविध संघटनांच्या नेत्यांकडून ऐकायला मिळत आहेत.