शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यातील ११२ गावपाड्यांची पाणीटंचाई दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सतत पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील रहिवाशांना मुबलक पाणी देण्यासाठी ११२ गावांच्या पाणीपुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सतत पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील रहिवाशांना मुबलक पाणी देण्यासाठी ११२ गावांच्या पाणीपुरवठा योजना व २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलसाठी तब्बल ४९ कोटी ७४ लाखांचा निधी पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजूर केल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील गावपाड्यांमधील पाणीटंचाई कायमची संपविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदने ३२ कोटी २९ लाख रुपये खर्चून ८० गावांसह १६२ पाडे आदी २४२ गावागावात तब्बल २५० नवीन बोअरवेल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तर, ११२ गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना व जुन्यांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर करून त्याच्या खर्चाला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली, असे पवार यांनी सांगितले.

यात ३० गावांमध्ये नव्या पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या आहेत. तर, ५८ गावांमधील योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय २४ गावांमधील योजनांची विशेष दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. याप्रमाणेच ३२ कोटी २९ लाखांच्या निधीतून ८० गावांतील १६२ पाड्यांसाठी २५० बोअरवेल नव्याने खोदण्यात येत आहेत. तर, सहा गावांमधील १७ बोअरवेलची दुरुस्ती केली आहे. जिल्ह्यातील १५ गावे व १३ पाड्यांवर सुमारे आठ कोटी रुपये खर्चून तात्पुरत्या पूरक नळपाणीपुरवठा योजना हाती घेतल्या. तर, सुमारे १९ कोटी रुपये खर्चून ७६ गावे व ५२ वाड्यांमधील १२९ जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती केल्याचा दावाही पवार यांनी केला.

.........