शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले पाणी, पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

अ आणि ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूचा परिरसर, वालधुनी भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मोहिली उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा बंद असल्याने डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद आहे. मोहिली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्रामधील नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

मोहने पम्पिंग स्टेशनमध्येही पाणी शिरल्याने कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण पश्चिम ब प्रभागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील खडकपाडा आणि क प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले असल्याची व त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती गंभीर होणार असल्याची अफवा सर्वत्र आहे. प्रत्यक्षात बारवी धरणाची भरून वाहण्याची पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सध्या बारवी धरणाची पातळी ६७.५० मीटर इतकी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे लगेच उघडण्याची शक्यता नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

-----------