शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले पाणी, पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

अ आणि ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूचा परिरसर, वालधुनी भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मोहिली उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा बंद असल्याने डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद आहे. मोहिली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्रामधील नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

मोहने पम्पिंग स्टेशनमध्येही पाणी शिरल्याने कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण पश्चिम ब प्रभागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील खडकपाडा आणि क प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले असल्याची व त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती गंभीर होणार असल्याची अफवा सर्वत्र आहे. प्रत्यक्षात बारवी धरणाची भरून वाहण्याची पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सध्या बारवी धरणाची पातळी ६७.५० मीटर इतकी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे लगेच उघडण्याची शक्यता नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

-----------