शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले पाणी, पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

अ आणि ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूचा परिरसर, वालधुनी भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मोहिली उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा बंद असल्याने डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद आहे. मोहिली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्रामधील नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

मोहने पम्पिंग स्टेशनमध्येही पाणी शिरल्याने कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण पश्चिम ब प्रभागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील खडकपाडा आणि क प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले असल्याची व त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती गंभीर होणार असल्याची अफवा सर्वत्र आहे. प्रत्यक्षात बारवी धरणाची भरून वाहण्याची पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सध्या बारवी धरणाची पातळी ६७.५० मीटर इतकी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे लगेच उघडण्याची शक्यता नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

-----------