शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

अंबरनाथ-बदलापूरमधील पाणीयोजना अद्याप अर्ध्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:10 IST

एमजेपीकडून पाणीपुरवठा योजनाच नव्हे तर भिवंडी, कल्याण परिसरातील मलनि:सारणाची कामेदेखील अर्धवट झाली असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जीवघेण्या पाणीटंचाईचा काळ संपत आलेला आहे. अवघ्या काही दिवसांत पाऊस पडणार आहे. पण, महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) नियंत्रणातील अंबरनाथ, बदलापूर शहरांच्या पाणीपुरवठा योजनेची कामे अद्यापही अर्धवट आहेत. तर, पाण्याच्या शोधात वणवण भटकणाऱ्या २७ गावांच्या योजनेसाठी अद्यापही ठेकेदाराचा शोध सुरू आहे. एमजेपीच्या या गलथानपणाविरोधात लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

एमजेपीच्या यंत्रणेद्वारे बहुतांशी कामे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, भिवंडी आणि २७ गावांच्या पाणीपुरवठ्याची कामे सुरू आहेत. पण, ढिसाळ व निष्काळजी व्यवस्थापनामुळे लोकांच्या जिव्हाळ्याची ही कामे मंदगतीने सुरू आहेत. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. एमजेपीच्या या निष्काळजीपणाला वैतागून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची तंबी पालकमंत्र्यांनी दिली आहे. बदलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी ५९ किमीच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. पण, आतापर्यंत ४३ किमीचे काम पूर्ण झाल्याचे एमजेपीकडून स्पष्ट केले जात आहे. तर, अंबरनाथच्या पाइपलाइनचे सात किमीचे काम अजून अर्धवट असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

एमजेपीकडून पाणीपुरवठा योजनाच नव्हे तर भिवंडी, कल्याण परिसरातील मलनि:सारणाची कामेदेखील अर्धवट झाली असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. एमजेपीचे जिल्ह्यात कोठेही चांगले काम नसून ते पूर्णही झालेले नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २७ गावांची पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आदेश जारी झाले आहेत. मात्र, ही योजना अजूनही निविदेतच अडकली आहे. दोनवेळा फेरनिविदा काढूनही केवळ दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या मंजुरीसंदर्भात एमएजेपीचे वेलरासूंकडे प्रस्ताव पाठवल्याचे नमूद करून एमजेपीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वच कामांच्या बाबतीत एमजेपीची निष्काळजी दिसून येत आहे. एमजेपीच्या कामांना ठेकेदार का मिळत नाही, अशी विचारणादेखील खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

पाणीयोजना अडवणाºया भंगारवाल्यांवर कारवाई करानवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या व सध्या जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेल्या १४ गावांच्या ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तेथील हातपंपाचे केमिकलमिश्रित पाणी ग्रामस्थ वापरत असल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. तहान भागवण्यासाठी पिण्याचे पाणी कसेबसे मिळवणाºया ग्रामस्थांना दोन दिवस कपडे धुण्यासाठी पाणी मिळत नाही. या गावकऱ्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना टाकण्यात येत आहे. मात्र, येथील भंगारवाल्याकडून ती अडवण्यात आली आहे. त्यांच्याकडून या कामास विरोध झाल्यामुळे या योजनेचे काम रखडले आहे. या योजनेस मार्गी लावण्यासाठी पोलिसांना या भंगारवाल्यावर कडक कारवाई करण्याचे फर्मान पालकमंत्र्यांकडून देण्यात आले.

पेंढरघोळच्या विहिरीचे ८० टक्के काममुरबाड तालुक्यातील पेंढरघोळ येथे विहीर खोदली असून त्यास या कडकडीत उन्हाळ्यात पाणी लागले आहे. या विहिरीचे बांधकाम त्वरित करण्याचे काम पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे दिले. पण, अजूनही केवळ ८० टक्के काम झाल्याचे ऐकून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, मुरबाड तालुक्यासाठी सिंटेक्स टाक्या मंजूर झालेल्या असूनही त्या अद्याप पाठवण्यात आलेल्या नसल्यामुळे कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली.

गाळ काढण्यासाठी पोकलेन-जेसीबीशहापूर तालुक्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी कोरड्या धरणाच्या बंधाºयांचा गाळ काढण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यासाठी किती जेसीबी, पोकलेन मशीन, डम्पर लागणार ते वेळीच सांगा. त्यासाठी जास्तीतजास्त १० लाखांचा खर्च येणार आहे. तो त्वरित देण्याचे सांगून तसे नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेस सांगितले.