शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यातील नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील एक गाव, नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली असून या ग्रामस्थांना आतापर्यंत तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील एक गाव, नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली असून या ग्रामस्थांना आतापर्यंत तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

या वर्षी उशिरा का होईना तालुक्यात

पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ही पाणीटंचाई या वर्षी मागील वर्षीप्रमाणेच उग्र रूप धारण करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. यावर्षी अवकाळी पावसामुळे आतापर्यंत विहिरींना पाणी असल्याने मागील वर्षीसारखी पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत असताना मात्र येत्या काही दिवसांत कडक उन्हामुळे विहिरींनी तळ गाठल्याने ती भयानक स्वरूप प्राप्त करेल, अशी चिन्हे पाहायला मिळत आहे.

तालुक्यात सद्य:स्थितीत दांड या गावाबरोबरच वरचा गायदरा, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वारलीपाडा, बिबलवाडी, चिंतामणवाडी, पारधवाडी, उठावा येथे तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. किशोर गायकवाड हे त्यासाठी मेहनत घेत आहेत.

तालुक्यात लाखो रुपये खर्चूनही अनेक गावांमध्ये पाणीयोजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत व आजही त्यांच्यावर तितकाच खर्च होत आहे. तर, अनेक योजना या कागदावरच असून कोणीही या गावपाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायम सोडवू शकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्या कोणतीही योजना आली, तरी तालुक्यातील नागरिकांच्या नशिबी तीव्र पाण्याच्या झळा कायमच राहणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.