शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

खरवंदची पाणीटंचाई झाली आॅस्ट्रेलियन दातृत्वाने दूर

By admin | Updated: December 14, 2015 00:41 IST

या तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे

हुसेन मेमन,  जव्हारया तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे. त्यामुळे या गावातील महिलांचा आनंद गगनाला भिडला होता. हा चमत्कार घडला तो आॅस्ट्रेलियातील दानशूर कुमार कुटुंब व खरवंद गावातील आदिवासिंचे योगदान यामुळे या नळपाणी योजनेचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी १२.३० वाजता पार पडला. जव्हार तालुक्यापासून - १२ कि.मी. अंतरावर असलेल्या खरवंद गावात ७२ कुटुंबे आहेत. तर ३३३ लोकसंख्या आहे. स्वातंत्र्यपासून भीषण पाणीटंचाईने हे गाव ग्रस्त होते. त्याता डिसेंबर महिन्यापासूंनच तीव्र पाणीटंचाई सुरु व्हायची, व येथील महिलांना रात्री-बेरात्री जागून पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासी महिलांना रोज ५ ते ६ तास वणवण करावी लागयची. ती आता या पाणीयोजनेमुळे संपुष्टात आली आहे. तसेच गावच्या श्रमदानाचाही तिला हातभार लागला आहे. या प्रयोगाचे अनुकरण सर्वत्र व्हावे अशी अपेक्षा आहे.आॅस्ट्रेलियातील- मुरली कुमार व त्याची पत्नी- वंदना मुरली कुमार यांच्या कुटुंबांने, मनाच्या समाधानासाठी जव्हार खरवंद गावात आज नळपाणी पाणीपुरवठा योजनेचा सुभारंभ केला. या योजनेसाठी, त्यांनी ५ लाखांची देणगी दिली आहे. या देणगीतून व ग्रामस्थांनी एकत्र येवून स्वयंम ग्राम पाणीपुरवठा लोकसहभागातून तिचा शुभारंभ आज केला. त्यामुळे या गावाला मुबलक पाणी मिळू लागले आहे. वर्षानुवर्षे असलेली पाणीटंचाई जशी यामुळे दूर झाली आहे. तसेच दूषित पाण्यामुळे गावात फैलावणारी रोगराईदेखील टळली आहे.याप्रसंगी कुमार कुटुंब, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष- सुरेखा थेतले, जव्हार पंस. सभापती- ज्योती भोये, वनवासी कल्याण आश्रम मुंबईचे काचारेकर, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रचे व भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस- हरिचंद्र भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य- विनायक राऊत, ग्रामदान मंडळ जामसर -विठठल थेतले, योगेश भोये, स्वयम ग्राम नळपाणी योजना तथा खरवंद समिती उपस्थित होते.