शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्षामुळे पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसह नगरसेवक, राजकारण्यांनी सातत्याने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे चालवलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसह नगरसेवक, राजकारण्यांनी सातत्याने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे चालवलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत कमालीची उदासीनता याबाबत कारणीभूत ठरत असून, पाणीसमस्या कायम पेटवत ठेवायची राजकारणी, प्रशासनाची मानसिकता आहे का, असा प्रश्न केला जात आहे.

नियमातील तरतुदी आणि केंद्र व राज्य शासन आणि पालिकास्तरावर पाऊसपाणी संकलन योजना अर्थात रेनवॉटर हार्वेस्टिंग राबवणे बंधनकारक आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवता येते. सध्या सततच्या पाणीउपशामुळे बोअरिंग, विहिरीतील गोड्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवताना रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणे बंधनकारक आहे. मात्र, विकासकांकडून इमारतीच्या तळाला किंवा गच्चीवर त्यासाठी स्वतंत्र टाकी बांधली जात नाही. त्यासाठी स्वतंत्र नळ व प्लम्बिंग करतच नाही. तळाला केवळ दाखवण्यापुरती रिंगवेल असते. रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू नसतानाही पाणीपुरवठा विभाग नाहरकत प्रमाणपत्र देत आहे, तर अनेक वर्षे रेनवाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बंद असूनही दरवर्षी ती सुरू असल्याची प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र हाेत असल्यामुळे नवीन नळजोडण्या देणे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ बंद केले हाेते.

७५ दशलक्ष लिटर योजना सुरू झाल्यानंतर नळजोडण्या देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, सारासार विचार न करता देण्यात येणाऱ्या नळजाेडण्यांमुळे आता पुन्हा पाणीसमस्या भेडसावू लागली आहे. अर्थसंकल्पात अनावश्यक गाेष्टींवर उधळपट्टीसाठी भरघाेस आर्थिक तरतूद असते. मात्र, रेनवाॅटरसारख्या आवश्यक उपक्रमांसाठी मात्र पालिकेच्या अंदाजपत्रकात नाममात्र तरतूद केली जाते. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या मालमत्तांमध्ये नवीन रेनवॉटर प्रकल्प उभारणीस सुरुवात करणे आवश्यक होते. तसेच ज्या इमारती-बांधकामांना रेनवॉटर बंधनकारक आहे, तेथे ही यंत्रणा सुरू करणे आवश्यक हाेते. पण नगरसेवक, राजकारणी व महापालिका प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याने शहरातील नागरिकांच्या माथी पाणीटंचाई लादली जात आहे.

पालिकेच्या आस्थापनातही यंत्रणेचा अभाव

पालिकेच्या मालमत्ता असलेल्या इमारती, शाळा, उद्याने, मैदाने, स्मशानभूमी, सभागृह आदी ठिकाणीही या यंत्रणेचा पत्ता नाही. महापालिका मुख्यालयातही ती नावापुरती आहे. नियमातील तरतुदी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांना सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. विरोधी पक्षातील शिवसेना-काँग्रेसनेही याबाबत चुप्पी साधली आहे. पालिकेकडून करसवलतीबाबत माहिती देऊन नागरिकांना प्राेत्साहित करायला हवे. मात्र, नागरिकांना पाण्यासाठी सतत तहानलेले ठेवण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे दिसत आहे.