शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्षामुळे पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसह नगरसेवक, राजकारण्यांनी सातत्याने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे चालवलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसह नगरसेवक, राजकारण्यांनी सातत्याने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे चालवलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत कमालीची उदासीनता याबाबत कारणीभूत ठरत असून, पाणीसमस्या कायम पेटवत ठेवायची राजकारणी, प्रशासनाची मानसिकता आहे का, असा प्रश्न केला जात आहे.

नियमातील तरतुदी आणि केंद्र व राज्य शासन आणि पालिकास्तरावर पाऊसपाणी संकलन योजना अर्थात रेनवॉटर हार्वेस्टिंग राबवणे बंधनकारक आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवता येते. सध्या सततच्या पाणीउपशामुळे बोअरिंग, विहिरीतील गोड्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवताना रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणे बंधनकारक आहे. मात्र, विकासकांकडून इमारतीच्या तळाला किंवा गच्चीवर त्यासाठी स्वतंत्र टाकी बांधली जात नाही. त्यासाठी स्वतंत्र नळ व प्लम्बिंग करतच नाही. तळाला केवळ दाखवण्यापुरती रिंगवेल असते. रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू नसतानाही पाणीपुरवठा विभाग नाहरकत प्रमाणपत्र देत आहे, तर अनेक वर्षे रेनवाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बंद असूनही दरवर्षी ती सुरू असल्याची प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र हाेत असल्यामुळे नवीन नळजोडण्या देणे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ बंद केले हाेते.

७५ दशलक्ष लिटर योजना सुरू झाल्यानंतर नळजोडण्या देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, सारासार विचार न करता देण्यात येणाऱ्या नळजाेडण्यांमुळे आता पुन्हा पाणीसमस्या भेडसावू लागली आहे. अर्थसंकल्पात अनावश्यक गाेष्टींवर उधळपट्टीसाठी भरघाेस आर्थिक तरतूद असते. मात्र, रेनवाॅटरसारख्या आवश्यक उपक्रमांसाठी मात्र पालिकेच्या अंदाजपत्रकात नाममात्र तरतूद केली जाते. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या मालमत्तांमध्ये नवीन रेनवॉटर प्रकल्प उभारणीस सुरुवात करणे आवश्यक होते. तसेच ज्या इमारती-बांधकामांना रेनवॉटर बंधनकारक आहे, तेथे ही यंत्रणा सुरू करणे आवश्यक हाेते. पण नगरसेवक, राजकारणी व महापालिका प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याने शहरातील नागरिकांच्या माथी पाणीटंचाई लादली जात आहे.

पालिकेच्या आस्थापनातही यंत्रणेचा अभाव

पालिकेच्या मालमत्ता असलेल्या इमारती, शाळा, उद्याने, मैदाने, स्मशानभूमी, सभागृह आदी ठिकाणीही या यंत्रणेचा पत्ता नाही. महापालिका मुख्यालयातही ती नावापुरती आहे. नियमातील तरतुदी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांना सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. विरोधी पक्षातील शिवसेना-काँग्रेसनेही याबाबत चुप्पी साधली आहे. पालिकेकडून करसवलतीबाबत माहिती देऊन नागरिकांना प्राेत्साहित करायला हवे. मात्र, नागरिकांना पाण्यासाठी सतत तहानलेले ठेवण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे दिसत आहे.