शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्षामुळे पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसह नगरसेवक, राजकारण्यांनी सातत्याने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे चालवलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना ...

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसह नगरसेवक, राजकारण्यांनी सातत्याने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे चालवलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत कमालीची उदासीनता याबाबत कारणीभूत ठरत असून, पाणीसमस्या कायम पेटवत ठेवायची राजकारणी, प्रशासनाची मानसिकता आहे का, असा प्रश्न केला जात आहे.

नियमातील तरतुदी आणि केंद्र व राज्य शासन आणि पालिकास्तरावर पाऊसपाणी संकलन योजना अर्थात रेनवॉटर हार्वेस्टिंग राबवणे बंधनकारक आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवता येते. सध्या सततच्या पाणीउपशामुळे बोअरिंग, विहिरीतील गोड्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवताना रेनवॉटर हार्वेस्टिंग उभारणे बंधनकारक आहे. मात्र, विकासकांकडून इमारतीच्या तळाला किंवा गच्चीवर त्यासाठी स्वतंत्र टाकी बांधली जात नाही. त्यासाठी स्वतंत्र नळ व प्लम्बिंग करतच नाही. तळाला केवळ दाखवण्यापुरती रिंगवेल असते. रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू नसतानाही पाणीपुरवठा विभाग नाहरकत प्रमाणपत्र देत आहे, तर अनेक वर्षे रेनवाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बंद असूनही दरवर्षी ती सुरू असल्याची प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र हाेत असल्यामुळे नवीन नळजोडण्या देणे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ बंद केले हाेते.

७५ दशलक्ष लिटर योजना सुरू झाल्यानंतर नळजोडण्या देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, सारासार विचार न करता देण्यात येणाऱ्या नळजाेडण्यांमुळे आता पुन्हा पाणीसमस्या भेडसावू लागली आहे. अर्थसंकल्पात अनावश्यक गाेष्टींवर उधळपट्टीसाठी भरघाेस आर्थिक तरतूद असते. मात्र, रेनवाॅटरसारख्या आवश्यक उपक्रमांसाठी मात्र पालिकेच्या अंदाजपत्रकात नाममात्र तरतूद केली जाते. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या मालमत्तांमध्ये नवीन रेनवॉटर प्रकल्प उभारणीस सुरुवात करणे आवश्यक होते. तसेच ज्या इमारती-बांधकामांना रेनवॉटर बंधनकारक आहे, तेथे ही यंत्रणा सुरू करणे आवश्यक हाेते. पण नगरसेवक, राजकारणी व महापालिका प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याने शहरातील नागरिकांच्या माथी पाणीटंचाई लादली जात आहे.

पालिकेच्या आस्थापनातही यंत्रणेचा अभाव

पालिकेच्या मालमत्ता असलेल्या इमारती, शाळा, उद्याने, मैदाने, स्मशानभूमी, सभागृह आदी ठिकाणीही या यंत्रणेचा पत्ता नाही. महापालिका मुख्यालयातही ती नावापुरती आहे. नियमातील तरतुदी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांना सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. विरोधी पक्षातील शिवसेना-काँग्रेसनेही याबाबत चुप्पी साधली आहे. पालिकेकडून करसवलतीबाबत माहिती देऊन नागरिकांना प्राेत्साहित करायला हवे. मात्र, नागरिकांना पाण्यासाठी सतत तहानलेले ठेवण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे दिसत आहे.