शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

बेकायदा बांधकामामुळे पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: March 8, 2017 04:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे तक्रार करूनही ते दखल घेतत नाही. त्यामुळे १५ मार्चला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भोपर परिसराच्या भाजपा नगरसेविका रविना माळी यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे. २७ गावे केडीएमसीत १ जून २०१५ ला समाविष्ट झाली. त्यानंतर ती वगळण्यासाठी राज्य सरकारने एक प्राथमिक अधिसूचना काढली. गावे वगळावीत अथवा महापालिकेत ठेवावी, याविषयी सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. गावे वगळण्याची मागणी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने केली आहे. त्याचबरोबर ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे वगळण्याच्या भूमिकेपेक्षा माझी भूमिका वेगळी नाही, असे सूतोवाच दिले होते. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घोषणा करता येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. महापालिकेकडून गावांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवल्या जात नसल्याची बाब माळी यांनी समोर आणली आहे. २७ गावांमध्ये बेकायदा बांधकामे सुरू असून, त्याविरोधात कारवाई करत नाही. बेकायदा बांधकामकांसाठी पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. मात्र, भोपर गावाला प्यायलाही पाणी मिळत नाही. त्याचबरोबर प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न आहे. पाणी व आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. महापालिकेतून गावे वगळली जाणार असल्यास त्यांच्या सोयीसुविधांवर कशाला निधी खर्च करायचा अशी मानसिकता आयुक्तांची असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप माळी यांनी केला आहे.यापूर्वी शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनीही २७ गावांमध्ये बेकायदा बांधकामे सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सभेत केला होता. त्याचा अहवाल तयार करून कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्त सुनील लहाने यांनी दिले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. तोच धागा पकडत माळी यांनी बेकायदा बांधकामे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवत आहेत, असा आरोप केला आहे. पिसवली प्रभागाच्या भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे यांनीही दोन आठवड्यांपूर्वी पाणी येत नसल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भाजपा गटनेते वरुण पाटील यांच्या मध्यस्थीने प्रभागात पाणी सुरळीत होईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले होते. याबाबत खंडागळे यांना विचारले असता त्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे सांगून संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)