शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वादात अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे ...

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे आणि आंदोलने करण्याचे इशारे देण्यात येत आहेत. शहरात पुढील काही दिवसांत पाणी समस्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका येथून चार एमएलडी पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता शिंदे यांनी एमआयडीसीकडे केली आहे.

२०२० मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली आणि काही भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण तुडुंब भरून वाहू लागले होते. मात्र धरणातून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने केली होती. त्यानंतर धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतल्यानंतर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा थांबवून एमआयडीसीकडून पाणी घेऊन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात आला होता. मात्र एकूण पाणीपुरवठ्याच्या केवळ ७० टक्के पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास केला जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सलग बारा तास सर्व आटे उघडून पाणीपुरवठा करण्याची मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.

अंबरनाथ शहराला बदलापूर येथील उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून सर्वाधिक ५० एमएलडी पाणी मिळते. त्यासोबतच एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे १० एमएलडी आणि चिखलोली धरणातून ६ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. चिखलोली धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सहा एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर, वडवली, कृष्णनगर या जवळपास एक लाख लोकवस्तीच्या परिसराला एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. त्यातच एमआयडीसीने महिन्यातून दोनदा पाणी कपात लागू केली आहे. त्यानंतर चिखलोली धरणातूनही पाणी मिळणार नसल्याने अंबरनाथकरांची पाणी समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

..................