शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वादात अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे ...

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे आणि आंदोलने करण्याचे इशारे देण्यात येत आहेत. शहरात पुढील काही दिवसांत पाणी समस्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका येथून चार एमएलडी पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता शिंदे यांनी एमआयडीसीकडे केली आहे.

२०२० मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली आणि काही भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण तुडुंब भरून वाहू लागले होते. मात्र धरणातून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने केली होती. त्यानंतर धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतल्यानंतर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा थांबवून एमआयडीसीकडून पाणी घेऊन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात आला होता. मात्र एकूण पाणीपुरवठ्याच्या केवळ ७० टक्के पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास केला जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सलग बारा तास सर्व आटे उघडून पाणीपुरवठा करण्याची मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.

अंबरनाथ शहराला बदलापूर येथील उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून सर्वाधिक ५० एमएलडी पाणी मिळते. त्यासोबतच एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे १० एमएलडी आणि चिखलोली धरणातून ६ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. चिखलोली धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सहा एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर, वडवली, कृष्णनगर या जवळपास एक लाख लोकवस्तीच्या परिसराला एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. त्यातच एमआयडीसीने महिन्यातून दोनदा पाणी कपात लागू केली आहे. त्यानंतर चिखलोली धरणातूनही पाणी मिळणार नसल्याने अंबरनाथकरांची पाणी समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

..................