शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वादात अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे ...

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोर्चे आणि आंदोलने करण्याचे इशारे देण्यात येत आहेत. शहरात पुढील काही दिवसांत पाणी समस्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका येथून चार एमएलडी पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता शिंदे यांनी एमआयडीसीकडे केली आहे.

२०२० मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली आणि काही भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण तुडुंब भरून वाहू लागले होते. मात्र धरणातून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने केली होती. त्यानंतर धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतल्यानंतर चिखलोली धरणातून पाणीपुरवठा थांबवून एमआयडीसीकडून पाणी घेऊन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात आला होता. मात्र एकूण पाणीपुरवठ्याच्या केवळ ७० टक्के पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास केला जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सलग बारा तास सर्व आटे उघडून पाणीपुरवठा करण्याची मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.

अंबरनाथ शहराला बदलापूर येथील उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून सर्वाधिक ५० एमएलडी पाणी मिळते. त्यासोबतच एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे १० एमएलडी आणि चिखलोली धरणातून ६ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. चिखलोली धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सहा एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर, वडवली, कृष्णनगर या जवळपास एक लाख लोकवस्तीच्या परिसराला एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. त्यातच एमआयडीसीने महिन्यातून दोनदा पाणी कपात लागू केली आहे. त्यानंतर चिखलोली धरणातूनही पाणी मिळणार नसल्याने अंबरनाथकरांची पाणी समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

..................