शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

अधिकाऱ्यांच्या तोंडचे पळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:33 IST

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे.

अनगाव : भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामविकास अधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन पाणीटंचाई दूर करण्याच्या उपायांवर लक्ष देणार माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाय न योजल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिल्याने या बैठकीत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाणीटंचाईच्या मुद्द्यावर सध्या सतत आंदोलने सुरू आहेत.या पाणीटंचाईचे भीषण चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आणि बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे यांनी गटविकास अधिकाºयांची भेट घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. २५ एप्रिलच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रवीकांत पाटील, माजी उपसभापती प्रकाश भोईर यांनी पाणीपुरवठा उपअभियंत्यांना धारेवर धरत टंचाई दूर करण्यासाठी सूचना केल्या. श्रमजीवी संघटनेने २७ एप्रिलला भिवंडी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाण्यासाठी आक्रोश केला.पाणीटंचाईचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरल्याने आणि संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरल्याने मंगळवारी तत्काळ ग्रामविकास अधिकाºयांची बैठक बोलावली आहे. अकरा ठिकाणी बोअरवेल खोदल्या आहेत. सहा ठिकाणी नादुरूस्त बोअरवेल दुरूस्त करून टाक्या बसवून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन यंत्रांद्वारे टंचाईग्रस्त गावपाड्यात बोअरवेल खोदण्याचे काम सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी श्रमजीवीचे संघटनेचे जनरल सक्रेटरी बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सचिव संगिता भोमटे, आशा भोईर, मोतीराम नामकुडा, केशव पारधी, गौतम पाटील, प्रकाश राऊत, सागर देसक या संघटनेच्या पदाधिकाºयांना दिली. उर्वरित गावपाड्यांची पाणीटंचाई लवकर दूर न केल्यास जिल्हा परिषद अध्यक्षांनाच घेराव घालण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे.सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना भिवंडी पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता एन. जी. राऊत पंचायत समितीत गैरहजर रहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली आहे.>शहापूरमधील टँकरचे पाणी२१ तारखेपासून होणार बंदभातसानगर : गेल्यावर्षी पाणी पुरवण्यासाठी वापरलेल्या टँकरची बिले अद्यापही न मिळाल्याने शहापूर तालुक्यात सध्या टँकरने होत असलेला पाणीपुरवठा २१ तारखेपासून बंद करण्याचा इशारा टँकरमालक विजय शिंदे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात गेल्यावर्षी १९ टँकरने टंचाईग्रस्त गावापाड्यांना पाणीपुरवठा केला होता मात्रे त्या बिलाचे ५५ लाख रु पये अजूनही या ठेकेदारांना न मिळाल्याने त्यांनी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा गटविकास अधिकारी व्ही. घोरपडे यांना दिला. सध्या २८ गावे, ८८ पाड्यांना टंचाई भेडसावते आहे.>पाणीपुरवठा मालकांची मानसिकता मी समजू शकतो. त्यांचे गेल्यावर्षीचे पैसे लवकरात लवकर मिळावे म्हणून मी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. पुन्हा तसे पत्र तयार करीत आहे.- व्ही. घोरपडे, गटविकास अधिकारी शहापूर

टॅग्स :bhiwandiभिवंडी