शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

अधिकाऱ्यांच्या तोंडचे पळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:33 IST

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे.

अनगाव : भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामविकास अधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन पाणीटंचाई दूर करण्याच्या उपायांवर लक्ष देणार माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाय न योजल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिल्याने या बैठकीत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाणीटंचाईच्या मुद्द्यावर सध्या सतत आंदोलने सुरू आहेत.या पाणीटंचाईचे भीषण चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आणि बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे यांनी गटविकास अधिकाºयांची भेट घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. २५ एप्रिलच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रवीकांत पाटील, माजी उपसभापती प्रकाश भोईर यांनी पाणीपुरवठा उपअभियंत्यांना धारेवर धरत टंचाई दूर करण्यासाठी सूचना केल्या. श्रमजीवी संघटनेने २७ एप्रिलला भिवंडी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाण्यासाठी आक्रोश केला.पाणीटंचाईचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरल्याने आणि संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरल्याने मंगळवारी तत्काळ ग्रामविकास अधिकाºयांची बैठक बोलावली आहे. अकरा ठिकाणी बोअरवेल खोदल्या आहेत. सहा ठिकाणी नादुरूस्त बोअरवेल दुरूस्त करून टाक्या बसवून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन यंत्रांद्वारे टंचाईग्रस्त गावपाड्यात बोअरवेल खोदण्याचे काम सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी श्रमजीवीचे संघटनेचे जनरल सक्रेटरी बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सचिव संगिता भोमटे, आशा भोईर, मोतीराम नामकुडा, केशव पारधी, गौतम पाटील, प्रकाश राऊत, सागर देसक या संघटनेच्या पदाधिकाºयांना दिली. उर्वरित गावपाड्यांची पाणीटंचाई लवकर दूर न केल्यास जिल्हा परिषद अध्यक्षांनाच घेराव घालण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे.सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना भिवंडी पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता एन. जी. राऊत पंचायत समितीत गैरहजर रहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली आहे.>शहापूरमधील टँकरचे पाणी२१ तारखेपासून होणार बंदभातसानगर : गेल्यावर्षी पाणी पुरवण्यासाठी वापरलेल्या टँकरची बिले अद्यापही न मिळाल्याने शहापूर तालुक्यात सध्या टँकरने होत असलेला पाणीपुरवठा २१ तारखेपासून बंद करण्याचा इशारा टँकरमालक विजय शिंदे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात गेल्यावर्षी १९ टँकरने टंचाईग्रस्त गावापाड्यांना पाणीपुरवठा केला होता मात्रे त्या बिलाचे ५५ लाख रु पये अजूनही या ठेकेदारांना न मिळाल्याने त्यांनी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा गटविकास अधिकारी व्ही. घोरपडे यांना दिला. सध्या २८ गावे, ८८ पाड्यांना टंचाई भेडसावते आहे.>पाणीपुरवठा मालकांची मानसिकता मी समजू शकतो. त्यांचे गेल्यावर्षीचे पैसे लवकरात लवकर मिळावे म्हणून मी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. पुन्हा तसे पत्र तयार करीत आहे.- व्ही. घोरपडे, गटविकास अधिकारी शहापूर

टॅग्स :bhiwandiभिवंडी