शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

होळीनंतर जिल्ह्याला पाणी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ दिवसांतून एकदा, अशी २४ तासांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ दिवसांतून एकदा, अशी २४ तासांची पाणीकपात लागू केलेली आहे; परंतु आता ती रद्द करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. होळीनंतर ती पूर्णपणे रद्द करून शहरांना त्यांचा आवश्यक तीन हजार ६२१ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्यामुळे गृहिणींची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

पाणीकपात रद्द करण्याच्या दृष्टीने गुरुवारी बैठक निश्चित केली होती; पण काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द झाली; परंतु पुढील आठवड्यापासून म्हणजे होळीनंतर या पाणी कपातीच्या समस्येला आता पूर्णविराम मिळून ती कायमची रद्द करण्याचा निर्णय होऊ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातून दोन वेळा २४ तासांची पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे; पण त्याहीपेक्षा महापालिका, नगरपालिका आणि पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांकडून या कपातीच्या कालावधीला धरून दुरुस्तीची कामे काढल्यामुळे पाणी समस्या जिल्ह्यात गंभीर झाली आहे.

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत. त्यामुळे कपातीचा कालावधी संपलेला असतानाही नागरिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे; पण आता ही कपातही रद्द होणार असल्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मागणीस अनुसरून मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे सुतोवाच पाटबंधारे विभागाने केले आहे. कारण आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आलेला आहे. त्यामुळे सध्याची लागू केलेली १५ दिवसातून एक वेळा २४ तासांची पाणीकपात आता रद्द करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

------------------