शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

पाटगाव ग्रामपंचायतीमधील दोन पाड्यांचा पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दोन तालुक्यांना उन्हाळ्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दोन तालुक्यांना उन्हाळ्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे अनेक गावपाड्यांची पाणीटंचाईमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात मुरबाड तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या व टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गेटाची वाडी व चाफेवाडी येथे नवीन नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यामुळे या दोन्ही पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. असे असले तरी, या जिल्ह्यातील अनेक गावे, पाडे आजही पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहापूर आणि मुरबाड या दोन्ही आदिवासीबहुल तालुक्यांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यांतील अनेक गावे, पाड्यांना फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही पायपीट करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील रखडलेल्या व बंद पडलेल्या योजनांचा आढावा घेतला. ज्या योजना कमी खर्चात कार्यान्वित करता येतील, त्या हाती घेऊन शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील अनेक योजना मार्गी लावल्या. मुरबाड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या गेटाचीवाडी व चाफेवाडी या दोन पाड्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. २०१८ मध्ये या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतून विहीर खोलीकरण व नूतनीकरण केल्यानंतरही उन्हाळ्यात १५ एप्रिलनंतर या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तसेच चाफेवाडी येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवत होती; परंतु तेथे विहीर खोलीकरण व विंधन विहिरीवर सोलर पंप योजना राबविल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. आता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गेटाचीवाडी व चाफेवाडी या दोन्ही ठिकाणी नवीन नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील एक हजार २०० लोकसंख्या असलेल्या पाड्यांवरील नागरिकांच्या चेहऱ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने आनंद दिसून आला.

.........

वाचली