शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नगरसेवकांमुळे निर्माण होते पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:28 IST

अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत. नगरसेवकांमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप अधिकारी करत आहेत. अधिकाºयांच्या या विधानाला काँग्रेस नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. प्राधिकरण स्वत:चे अपयश लपवत नगरसेवकांना लक्ष्य करत असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. तसेच नगरसेवकांवर खोटे आरोप करणाºया अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंंत्यांकडे केली आहे.मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात जीवन प्राधिकरणाला अपयश येत आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पध्दतीने व्हॉल आॅपरेटिंग केले जात असल्याने अनेक भागांना पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक भागांना गरज नसतानाही २० ते २२ तास पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका जावसई गाव, फुलेनगर, कमलाकर नगर, कोहोजगाव, वांद्रापाडा, डीएमसी चाळ, नालंदानगर या भागांना होत आहे. जासवई परिसराला पाणीपुरवठा होत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उत्तर देताना अधिकाºयांनी स्वत:ची जबाबदारी ही नगरसेवकांवर ढकलली. नगरसेवकांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप अधिकाºयांनी करून या प्रकरणातून स्वत:ला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या नगरसेवकांची नावे अधिकाºयांनी घेतली त्याच नगरसेवकांच्या प्रभागातही पाण्याचा प्रश्न आहे. असे असतानाही अधिकाºयांनी असे आरोप का केले याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात नागरिकांनी गोंधळ घातला. पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत अधिकाºयांना धारेवर धरले.जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने ते आपली जबाबदारी दुसºयावर टाकत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच टँकर लॉबीला खूष करण्यासाठी आणि काही बांधकाम व्यावसायिकांना पाण्याची सोय करण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला.