शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

सोनारपाड्यात दोन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कमी दाबामुळे दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने त्रस्त असलेल्या सोनारपाडा येथील साईधाम सोसायटीतील ९५ कुटुंबीयांना गुरुवारी केडीएमसीच्या डोंबिवलीतील ‘इ’ प्रभाग कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.

सोनारपाडा परिसरात केडीएमसीची बेकायदा नळजोडण्या तपासणी मोहीम सुरू होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने या मोहिमेला साईधाम सोसायटीने विरोध केला. तसेच पाणीप्रश्न मनप सोडवू शकत नाही, मग अशा मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पाणीपट्टी घेता; मग पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रहिवाशांनी दिला. तर, यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मनसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर, सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

दरम्यान, काही वेळाने मोर्चेकरी आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या इमारतीजवळ मनपाचे कर्मचारी अनधिकृत नळजोडण्या तपासणीसाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या इमारतीची एक नळजोडणी तोडली. याचा राग आल्याने येथील रहिवासी संतप्त झाले होते. या मोहिमेला विरोध करत आधी नोटीस द्या, मग तापसणी करा, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. वातावरण तापू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तोडलेली नळजोडणी पुन्हा पूर्ववत करून दिली.

याबाबत पाणीपुरवठा उपअभियंता अनंत मतगुंडी यांना विचारले असता ते म्हणाले, एमआयडीसीकडूनच कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेणार आहे.

----------------