शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

सोनारपाड्यात दोन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कमी दाबामुळे दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने त्रस्त असलेल्या सोनारपाडा येथील साईधाम सोसायटीतील ९५ कुटुंबीयांना गुरुवारी केडीएमसीच्या डोंबिवलीतील ‘इ’ प्रभाग कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.

सोनारपाडा परिसरात केडीएमसीची बेकायदा नळजोडण्या तपासणी मोहीम सुरू होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने या मोहिमेला साईधाम सोसायटीने विरोध केला. तसेच पाणीप्रश्न मनप सोडवू शकत नाही, मग अशा मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पाणीपट्टी घेता; मग पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रहिवाशांनी दिला. तर, यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मनसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर, सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

दरम्यान, काही वेळाने मोर्चेकरी आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या इमारतीजवळ मनपाचे कर्मचारी अनधिकृत नळजोडण्या तपासणीसाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या इमारतीची एक नळजोडणी तोडली. याचा राग आल्याने येथील रहिवासी संतप्त झाले होते. या मोहिमेला विरोध करत आधी नोटीस द्या, मग तापसणी करा, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. वातावरण तापू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तोडलेली नळजोडणी पुन्हा पूर्ववत करून दिली.

याबाबत पाणीपुरवठा उपअभियंता अनंत मतगुंडी यांना विचारले असता ते म्हणाले, एमआयडीसीकडूनच कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेणार आहे.

----------------