शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सोनारपाड्यात दोन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कमी दाबामुळे दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने त्रस्त असलेल्या सोनारपाडा येथील साईधाम सोसायटीतील ९५ कुटुंबीयांना गुरुवारी केडीएमसीच्या डोंबिवलीतील ‘इ’ प्रभाग कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.

सोनारपाडा परिसरात केडीएमसीची बेकायदा नळजोडण्या तपासणी मोहीम सुरू होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने या मोहिमेला साईधाम सोसायटीने विरोध केला. तसेच पाणीप्रश्न मनप सोडवू शकत नाही, मग अशा मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पाणीपट्टी घेता; मग पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रहिवाशांनी दिला. तर, यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मनसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर, सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

दरम्यान, काही वेळाने मोर्चेकरी आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या इमारतीजवळ मनपाचे कर्मचारी अनधिकृत नळजोडण्या तपासणीसाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या इमारतीची एक नळजोडणी तोडली. याचा राग आल्याने येथील रहिवासी संतप्त झाले होते. या मोहिमेला विरोध करत आधी नोटीस द्या, मग तापसणी करा, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. वातावरण तापू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तोडलेली नळजोडणी पुन्हा पूर्ववत करून दिली.

याबाबत पाणीपुरवठा उपअभियंता अनंत मतगुंडी यांना विचारले असता ते म्हणाले, एमआयडीसीकडूनच कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेणार आहे.

----------------