शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

नोटांसोबत आता पाणीही बंद!

By admin | Updated: November 16, 2016 04:33 IST

एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने

ठाणे/कल्याण : एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने आठवडाभर आधीच पाणीकपात लागू करून नागरिकांच्या तोंडचे उरलेसुरले पाणीही पळवले. इतर पालिकांत अवघी सात टक्के कपात लागू असल्याने महिन्यातून अवघे दोन दिवस पाणी बंद राहणार असताना कल्याण-डोंबिवलीत मात्र चार दिवस पाणीकपात लागू राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरूही झाली.वस्तुत: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना इतक्या लवकर पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र अनेक महापालिका त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याने पाटबंधारे विभागाने सात टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले. ही कपात पालिकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्याला सात टक्के या प्रमाणे चार दिवस किंवा महिन्यातूनव दोन दिवस लागू करायची होती. ठाणे पालिकेने पुढील आठवड्यापासून महिन्यातून दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. उल्हासनगर पालिकेत अवैध जोडण्यांमुळे सध्या टंचाई लागू असल्याने तेथे कपातीचा निर्णय झालेला नाही. मीरा-भाईंदर, भिवंडी पालिकांनी अद्या निर्णय घेतलेला नाही, तर कल्याण-डोंबिवली पालिकेने महिन्ेयातून चार दिवस म्हणजे १५ टक्के कपात लागू करून आठवडाभर अगोदर त्याची अंमलबजावणीही सुरू केली. यंदा पाऊस चांगला झाल्याने फारशी कपात करावी लागणार नाही, असे पालिकेचेच अधिकारी सांगत असताना ही कपात लागू झाली आहे. मनपाला उपलब्ध कोट्यानुसारच पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने लागू केला असून त्यानुसारच शहराचा पाणीपुरवठा दर मंगळवारी, तर ग्रामीण भागाचा दर शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. ठाणे जिल्ह्याातील महापालिकांना १५ नोव्हेंबरपासून पाणीकपातीची सक्ती लघुपाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र कपातीचे वेळापत्रक अद्यापही तयार न झाल्यामुळे इतर महापालिकांत पुढील आठवड्यापासून पाणीकपातीची अंमलबजावणी होणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार केडीएमसीने मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीकडून २७ गावांना पाणीपुरवठा होत असल्याने त्यांचा पुरवठा शुक्रवारी बंद राहील, असे जाहीर केले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरावा, यासाठी ही कपात लागू केल्याचे केडीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)