शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

नोटांसोबत आता पाणीही बंद!

By admin | Updated: November 16, 2016 04:33 IST

एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने

ठाणे/कल्याण : एकीकडे पुरेशा नोटा मिळत नसल्याने आठवडाभर सुरू असलेली नोटा बंदी पुरेशी नव्हती काय, म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने आठवडाभर आधीच पाणीकपात लागू करून नागरिकांच्या तोंडचे उरलेसुरले पाणीही पळवले. इतर पालिकांत अवघी सात टक्के कपात लागू असल्याने महिन्यातून अवघे दोन दिवस पाणी बंद राहणार असताना कल्याण-डोंबिवलीत मात्र चार दिवस पाणीकपात लागू राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरूही झाली.वस्तुत: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना इतक्या लवकर पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र अनेक महापालिका त्यांच्या मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याने पाटबंधारे विभागाने सात टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले. ही कपात पालिकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्याला सात टक्के या प्रमाणे चार दिवस किंवा महिन्यातूनव दोन दिवस लागू करायची होती. ठाणे पालिकेने पुढील आठवड्यापासून महिन्यातून दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. उल्हासनगर पालिकेत अवैध जोडण्यांमुळे सध्या टंचाई लागू असल्याने तेथे कपातीचा निर्णय झालेला नाही. मीरा-भाईंदर, भिवंडी पालिकांनी अद्या निर्णय घेतलेला नाही, तर कल्याण-डोंबिवली पालिकेने महिन्ेयातून चार दिवस म्हणजे १५ टक्के कपात लागू करून आठवडाभर अगोदर त्याची अंमलबजावणीही सुरू केली. यंदा पाऊस चांगला झाल्याने फारशी कपात करावी लागणार नाही, असे पालिकेचेच अधिकारी सांगत असताना ही कपात लागू झाली आहे. मनपाला उपलब्ध कोट्यानुसारच पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने लागू केला असून त्यानुसारच शहराचा पाणीपुरवठा दर मंगळवारी, तर ग्रामीण भागाचा दर शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. ठाणे जिल्ह्याातील महापालिकांना १५ नोव्हेंबरपासून पाणीकपातीची सक्ती लघुपाटबंधारे विभागाने केली आहे. मात्र कपातीचे वेळापत्रक अद्यापही तयार न झाल्यामुळे इतर महापालिकांत पुढील आठवड्यापासून पाणीकपातीची अंमलबजावणी होणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार केडीएमसीने मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीकडून २७ गावांना पाणीपुरवठा होत असल्याने त्यांचा पुरवठा शुक्रवारी बंद राहील, असे जाहीर केले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरावा, यासाठी ही कपात लागू केल्याचे केडीएमसीचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)