शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

पाणीकपात वाढणार

By admin | Updated: February 24, 2016 03:09 IST

उल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत.

- मुरलीधर भवार,  कल्याणउल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, सध्या लागू असलेली ४० टक्के पाणीकपात आणखी २५ टक्क्यांनी वाढवून ६५ टक्के करण्याचे तोंडी आदेश लघू पाटबंधारे विभागाने दिले आहेत. तसे झाल्यास याच पाण्यावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या उल्हासनगर, मीरा-भाईंदरसारख्या महापालिका, २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सध्याप्रमाणे दोन दिवस पाणी बंद आणि उरलेल्या दिवसांत रोज निम्मी पाणीकपात किंवा एक दिवासआड पाणी आणि उरलेले दिवस कमी दाबाने पुरवठा अशी पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळे एमआयडीसी त्यांच्या पाणीग्राहकांना- त्या त्या पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन दिवस पाणी पुरवत नाही. नंतरही एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी घरगुती ग्राहक त्रासलेले असतानाच उद्योगही अडचणीत आले आहेत. उल्हासनगर महापालिका पूर्णपणे एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाच नाही. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांनाही एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. त्यांना ३० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरविले जाते. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळेच या भागात परिस्थिती बिकट झाली आहे. एमआयडीसीच्या पाण्यावर मीरा-भाईंदर महापालिकेसह दिवा, मुंब्रा, कळवा या परिसरातील ग्राहक अवलंबून आहेत. सध्याची ही पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेली, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. ४० टक्के कपातीमुळे एमआयडीसीकडून आठवड्यातून केवळ साडेचार दिवस पाणीपुरवठा होतो. हॉटेलांना फटका, कामगारांवर उपासमारीची वेळएमआयडीसीचा 80%पाणीपुरवठा घरगुती आहे आणि उरलेला औद्योगिक म्हणजेच उद्योग, कारखान्यांना होतो. 3500कारखान्यांत ही 65%पाणीकपात लागू झाली, तर निम्मा आठवडा कारखाने बंद टेवण्याची वेळ येणार आहे. टँकरने पुरेसे पाणी मिळाले नाही, तर हॉटेलही बंद ठेवावी लागतील. त्याचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम होईल. उत्पादन घटेल. या कारखान्यांत साधारण लाखांवर कामगार काम करता. त्यांना टंचाईच्या काळात अकारण सुट्टी मिळेल आणि तेवढा पगार कमी झाल्याने त्यांच्या, कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उपासमारीची वेळ येऊ शकते. दोन-तीन दिवसांत अंमलबजावणी?लघू पाटबंधारे खात्याने एमआयडीसीला वाढीव पाणी कपातीचे सध्या दिलेले आदेश तोंडी असल्याने लेखी आदेशाशिवाय ही २५ टक्के वाढीव पाणीकपात लागू करणार नाही; तिची अंमलबजावणी सुरु करणार नाही, असा पावित्रा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्यामुले फार फरक पडणार नाही. २५ टक्के जादा पाणीकपातीची अंमलबजावणी तूर्त केवळ एक-दोन दिवस पुढे जाऊ शकते. लघू पाटबंधारे खात्याने या काळात लेखी स्वरुपात एमआयडीसीला आदेश दिले, तर वाढीव २५ टक्के कपात येत्या आठवड्यातच लागू होण्याची चिन्हे आहेत.