शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

पाणीकपात वाढणार

By admin | Updated: February 24, 2016 03:09 IST

उल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत.

- मुरलीधर भवार,  कल्याणउल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, सध्या लागू असलेली ४० टक्के पाणीकपात आणखी २५ टक्क्यांनी वाढवून ६५ टक्के करण्याचे तोंडी आदेश लघू पाटबंधारे विभागाने दिले आहेत. तसे झाल्यास याच पाण्यावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या उल्हासनगर, मीरा-भाईंदरसारख्या महापालिका, २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सध्याप्रमाणे दोन दिवस पाणी बंद आणि उरलेल्या दिवसांत रोज निम्मी पाणीकपात किंवा एक दिवासआड पाणी आणि उरलेले दिवस कमी दाबाने पुरवठा अशी पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळे एमआयडीसी त्यांच्या पाणीग्राहकांना- त्या त्या पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन दिवस पाणी पुरवत नाही. नंतरही एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी घरगुती ग्राहक त्रासलेले असतानाच उद्योगही अडचणीत आले आहेत. उल्हासनगर महापालिका पूर्णपणे एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाच नाही. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांनाही एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. त्यांना ३० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरविले जाते. सध्याच्या ४० टक्के पाणी कपातीमुळेच या भागात परिस्थिती बिकट झाली आहे. एमआयडीसीच्या पाण्यावर मीरा-भाईंदर महापालिकेसह दिवा, मुंब्रा, कळवा या परिसरातील ग्राहक अवलंबून आहेत. सध्याची ही पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेली, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. ४० टक्के कपातीमुळे एमआयडीसीकडून आठवड्यातून केवळ साडेचार दिवस पाणीपुरवठा होतो. हॉटेलांना फटका, कामगारांवर उपासमारीची वेळएमआयडीसीचा 80%पाणीपुरवठा घरगुती आहे आणि उरलेला औद्योगिक म्हणजेच उद्योग, कारखान्यांना होतो. 3500कारखान्यांत ही 65%पाणीकपात लागू झाली, तर निम्मा आठवडा कारखाने बंद टेवण्याची वेळ येणार आहे. टँकरने पुरेसे पाणी मिळाले नाही, तर हॉटेलही बंद ठेवावी लागतील. त्याचा सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम होईल. उत्पादन घटेल. या कारखान्यांत साधारण लाखांवर कामगार काम करता. त्यांना टंचाईच्या काळात अकारण सुट्टी मिळेल आणि तेवढा पगार कमी झाल्याने त्यांच्या, कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उपासमारीची वेळ येऊ शकते. दोन-तीन दिवसांत अंमलबजावणी?लघू पाटबंधारे खात्याने एमआयडीसीला वाढीव पाणी कपातीचे सध्या दिलेले आदेश तोंडी असल्याने लेखी आदेशाशिवाय ही २५ टक्के वाढीव पाणीकपात लागू करणार नाही; तिची अंमलबजावणी सुरु करणार नाही, असा पावित्रा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्यामुले फार फरक पडणार नाही. २५ टक्के जादा पाणीकपातीची अंमलबजावणी तूर्त केवळ एक-दोन दिवस पुढे जाऊ शकते. लघू पाटबंधारे खात्याने या काळात लेखी स्वरुपात एमआयडीसीला आदेश दिले, तर वाढीव २५ टक्के कपात येत्या आठवड्यातच लागू होण्याची चिन्हे आहेत.