शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केडीएमसी मुख्यालयात होतेय पाणीगळती, दर मिनिटाला चार लीटर वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 03:05 IST

‘पाणी जपून वापरा’, असा संदेश केडीएमसी देत असली, तरी पालिकेच्या मुख्यालयातच पाण्याची गळती होत आहे.

कल्याण : ‘पाणी जपून वापरा’, असा संदेश केडीएमसी देत असली, तरी पालिकेच्या मुख्यालयातच पाण्याची गळती होत आहे. त्यात दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.महापालिका मुख्यालयातील प्रशासकीय भवनाच्या तळ मजल्यावर प्रसाधनगृह आहे. त्यातील नळाची तोटीच गायब झाली आहे. या प्रसाधनगृहाचा वापर महापालिकेचे कर्मचारी व बाहेरील नागरिकही करतात. त्यामुळे नळाची नासधूस कोण करते, याचा प्रशासनाने शोध घेतला पाहिजे. मात्र, तो घेतला जात नाही. दोन महिन्यांपासून हा नळ फुटला आहे. त्याद्वारे १५ सेकंदाला एक लीटर पाणी वाया जात आहे. दर मिनिटाला चार लीटर, तर दर तासाला २४० लीटर पाणी वाया जात आहे. २४ तासांत पाच हजार ७६० लीटर पाणी वाया जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.महापालिकेने २००८ मध्ये केलेल्या पाणी लेखापरीक्षणानुसार २१ टक्के पाणीगळती महापालिका हद्दीत आहे. जागतिक निकषांनुसार १५ टक्के पाणीगळती असणे काही गैर नाही. मात्र, महापालिका हद्दीत २१ टक्के पाणीगळती आहे. ती रोखण्यासाठी महापालिकेने २००८ पासून आजवर काहीच केलेले नाही. तसेच १० वर्षांत महापालिकेस पाण्याचे लेखापरीक्षण करण्याची गरज भासलेली नाही. महापालिकेस गळती रोखायची नसल्याने लेखापरीक्षण कशाला, अशीच मानसिकता अधिकाऱ्यांची असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका