शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

उल्हासनगरात जलवाहिन्या गळती, लाखो लिटर पाणी नाल्यात, रस्त्याचीही दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 17:21 IST

Ulhasnagar: महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.

- सदानंद नाईक उल्हासनगर : उपमहापौर भगवान भालेराव, प्रभाग समिती सभापती शुभांगी निकम यांचा प्रभाग असलेल्या आझाद चौक परिसरात जलवाहिन्या गळती लागून लाखो लिटर पाणी नालीत जात आहे. पाणी गळतीने रस्त्यांची दुरावस्था झाली असून पाणी गळती बाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाला माहिती दिल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली आहे.

 उल्हासनगर महापालिका प्रभाग क्र-७ मधून रिपाईचे भगवान भालेराव, त्यांच्या धर्मपत्नी अपेक्षा भालेराव, भाजपच्या लक्ष्मी सिंग व ओमी टीमच्या शुभांगी निकम असे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी भगवान भालेराव हे उपमहापौर असून शुभांगी निकम प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती आहेत. प्रभागात झोपडपट्टीचा भाग ७० टक्के पेक्षा असून लहान मोठे कारखान्याची संख्याही लक्षणीय आहे. प्रभागात विकास कामे करण्याचा मोठा वाव असताना, प्रभाग अत्यंत गलिच्छ झाला आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीच पाणी असून रस्त्याची दुरावस्था झाली. गेल्या अनेक वर्षापासून असेच चित्र परिसराची असल्याची प्रतिक्रीया नागरिकांसह दुकानदारांनी दिली. जुन्या व शेकडो ठिकाणी गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरस्ती महापालिका पाणीपुरवठा विभाग केंव्हा करते. याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अनियमित पाणी पुरवठा, पाणी गळती व वितरणातील त्रुटींमुळे आजही अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात मराठा सेक्शन परिसरातील महिलांना पाण्यासाठी दोनदा रस्त्यावर उतरावे लागले. तर इतर परिसरातील पाणी टंचाईची ओरड नागरिकांकडून होत आहे. समसमान पाणी पुरावठयासाठी महापालिकेने ५०० कोटीची पाणी वितरण योजना राबविली. मात्र ती अपूर्ण राहिली असून शहरात पुन्हा पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असल्याची ओरड सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून होत आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांनी प्रभागातील पाणी गळतीची समस्या पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी बी सोनावणे यांना दिली. पाणी गळती व जलवाहिनी दुरस्तीचे काम करत नसल्याची नाराजी भालेराव यांनी व्यक्त केली. 

लाखो लिटर पाणी नाल्यात

 महापालिका प्रभाग क्रं-७ मधील बहुतांश ठिकाणच्या जलवाहिन्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी दररोज नालीत जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक नगरसेवक व उपमहापौर भगवान भालेराव यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.