शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

उल्हासनगरात जलवाहिन्या गळती, लाखो लिटर पाणी नाल्यात, रस्त्याचीही दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 17:21 IST

Ulhasnagar: महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.

- सदानंद नाईक उल्हासनगर : उपमहापौर भगवान भालेराव, प्रभाग समिती सभापती शुभांगी निकम यांचा प्रभाग असलेल्या आझाद चौक परिसरात जलवाहिन्या गळती लागून लाखो लिटर पाणी नालीत जात आहे. पाणी गळतीने रस्त्यांची दुरावस्था झाली असून पाणी गळती बाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाला माहिती दिल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली आहे.

 उल्हासनगर महापालिका प्रभाग क्र-७ मधून रिपाईचे भगवान भालेराव, त्यांच्या धर्मपत्नी अपेक्षा भालेराव, भाजपच्या लक्ष्मी सिंग व ओमी टीमच्या शुभांगी निकम असे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी भगवान भालेराव हे उपमहापौर असून शुभांगी निकम प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती आहेत. प्रभागात झोपडपट्टीचा भाग ७० टक्के पेक्षा असून लहान मोठे कारखान्याची संख्याही लक्षणीय आहे. प्रभागात विकास कामे करण्याचा मोठा वाव असताना, प्रभाग अत्यंत गलिच्छ झाला आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीच पाणी असून रस्त्याची दुरावस्था झाली. गेल्या अनेक वर्षापासून असेच चित्र परिसराची असल्याची प्रतिक्रीया नागरिकांसह दुकानदारांनी दिली. जुन्या व शेकडो ठिकाणी गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरस्ती महापालिका पाणीपुरवठा विभाग केंव्हा करते. याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अनियमित पाणी पुरवठा, पाणी गळती व वितरणातील त्रुटींमुळे आजही अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात मराठा सेक्शन परिसरातील महिलांना पाण्यासाठी दोनदा रस्त्यावर उतरावे लागले. तर इतर परिसरातील पाणी टंचाईची ओरड नागरिकांकडून होत आहे. समसमान पाणी पुरावठयासाठी महापालिकेने ५०० कोटीची पाणी वितरण योजना राबविली. मात्र ती अपूर्ण राहिली असून शहरात पुन्हा पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असल्याची ओरड सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून होत आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांनी प्रभागातील पाणी गळतीची समस्या पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी बी सोनावणे यांना दिली. पाणी गळती व जलवाहिनी दुरस्तीचे काम करत नसल्याची नाराजी भालेराव यांनी व्यक्त केली. 

लाखो लिटर पाणी नाल्यात

 महापालिका प्रभाग क्रं-७ मधील बहुतांश ठिकाणच्या जलवाहिन्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी दररोज नालीत जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक नगरसेवक व उपमहापौर भगवान भालेराव यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.