शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

पाणीप्रश्नी महिलांचा आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ...

बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ३० संतप्त महिलांनी जागतिक महिला दिनीच गढूळ पाण्याच्या बाटल्या घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयावर धडक दिली.

लाखो रुपये मजीप्राला दिल्याने आमची एरंजाड चिकनपाडा येथील जुनी लाईन बिल्डरला दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. त्यामुळेच बिल्डिंगमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळते, मात्र आम्ही गाववाले असून, आम्हाला फक्त अर्धा तास आणि तेही गढूळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे. तसेच या गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवून हे पाणी तुम्ही तरी प्याल का? असा प्रश्न उपस्थित करून पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी कुसूम मेहेर, कविता मेहेर, सुषमा बोराडे, नयन बोराडे, सदानंद मेहेर, रूपेश मेहेर विष्णू वझे व इतर नागरिक होते.

काेट

चिकनपाड्याला सोनिवली नाक्यावरून पाणी देत होतो. पावसाळ्यात ही लाईन चोकअप झाल्याने तात्पुरती लाईन एकविरा धाब्याजवळ क्राॅस कनेक्शन करून दिली होती. मात्र, रोड क्राॅसिंगची पाईपलाईन सारखी फुटत असल्याने मागील आठवड्यात बिडाची पाईप टाकत असताना अगोदरचे गढूळ पाणी त्यामध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी गढूळ पाणी येत असेल, मात्र पुढील दोन दिवसांत त्यांची पाण्याची समस्या सोडवली जाईल.

- सुहास मगदूम, डेप्युटी इंजिनिअर, मजीप्रा.