शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

पाणीप्रश्नी महिलांचा आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ...

बदलापूर : बदलापुरातील चिकनपाडा परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने वसाहतीतील २५ ते ३० संतप्त महिलांनी जागतिक महिला दिनीच गढूळ पाण्याच्या बाटल्या घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयावर धडक दिली.

लाखो रुपये मजीप्राला दिल्याने आमची एरंजाड चिकनपाडा येथील जुनी लाईन बिल्डरला दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. त्यामुळेच बिल्डिंगमधील नागरिकांना मुबलक पाणी मिळते, मात्र आम्ही गाववाले असून, आम्हाला फक्त अर्धा तास आणि तेही गढूळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे. तसेच या गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवून हे पाणी तुम्ही तरी प्याल का? असा प्रश्न उपस्थित करून पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी कुसूम मेहेर, कविता मेहेर, सुषमा बोराडे, नयन बोराडे, सदानंद मेहेर, रूपेश मेहेर विष्णू वझे व इतर नागरिक होते.

काेट

चिकनपाड्याला सोनिवली नाक्यावरून पाणी देत होतो. पावसाळ्यात ही लाईन चोकअप झाल्याने तात्पुरती लाईन एकविरा धाब्याजवळ क्राॅस कनेक्शन करून दिली होती. मात्र, रोड क्राॅसिंगची पाईपलाईन सारखी फुटत असल्याने मागील आठवड्यात बिडाची पाईप टाकत असताना अगोदरचे गढूळ पाणी त्यामध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी गढूळ पाणी येत असेल, मात्र पुढील दोन दिवसांत त्यांची पाण्याची समस्या सोडवली जाईल.

- सुहास मगदूम, डेप्युटी इंजिनिअर, मजीप्रा.