शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

एका तलावातून चार गावांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:40 IST

शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे. आता तर एक तलाव आणि चार गावे अशी परिस्थिती असून पाणी मिळणार कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे.तालुक्यातील साखरोली, कानविंदे, कळमगाव या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एकमेव तलावातून पुणधे, आटगाव, साखरोली, कानविंदे आणि ११ पाड्यांत पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा पुरवठा सुरळीत होता. मात्र, दोन वर्षांपासून याच गावपाड्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. तलावातील पाणीपातळी पाहता गावपाड्यांना किती आणि कसा पुरवठा होऊ शकतो, हाच मोठा प्रश्न आहे.साखरोली गावानजीक एक तलाव असून यातूनच आटगाव, कळमगाव, कानविंदे या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच तलावाच्या खाली कानविंदे, आटगाव आणि त्यातही खाली पुंध्येगावासाठीची विहीर बांधण्यात आली आहे. सध्या पाण्याची मागणी पाहता कळमगाव, कानविंदे आणि आटगाव यांच्यासाठी असणाऱ्या विहिरीचे दररोज पाणी लागते आहे. उपसा झाल्यानंतर या विहिरी पुन्हा भरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या विहिरींच्या खालच्या भागात असणाऱ्या पुंध्ये या गावासाठीच्या विहिरीत कमी पाणी जमा होत असल्याने या गावासाठी पाणी पुरवणे मुश्कील झाले असल्याने आता या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, यंदा पाण्याची बिकट अवस्था असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हा तलाव अनेक वर्षांपूर्वीचा असून या तलावातील गाळ काढून त्याची उंची वाढवून गळती थांबवल्यास या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी तीनही ग्रामपंचायतींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पुणधे ग्रामपंचायतीचे सदस्य रामकृष्ण निचिते यांनी सांगितले.