शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

एका तलावातून चार गावांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:40 IST

शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे. आता तर एक तलाव आणि चार गावे अशी परिस्थिती असून पाणी मिळणार कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे.तालुक्यातील साखरोली, कानविंदे, कळमगाव या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एकमेव तलावातून पुणधे, आटगाव, साखरोली, कानविंदे आणि ११ पाड्यांत पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा पुरवठा सुरळीत होता. मात्र, दोन वर्षांपासून याच गावपाड्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. तलावातील पाणीपातळी पाहता गावपाड्यांना किती आणि कसा पुरवठा होऊ शकतो, हाच मोठा प्रश्न आहे.साखरोली गावानजीक एक तलाव असून यातूनच आटगाव, कळमगाव, कानविंदे या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच तलावाच्या खाली कानविंदे, आटगाव आणि त्यातही खाली पुंध्येगावासाठीची विहीर बांधण्यात आली आहे. सध्या पाण्याची मागणी पाहता कळमगाव, कानविंदे आणि आटगाव यांच्यासाठी असणाऱ्या विहिरीचे दररोज पाणी लागते आहे. उपसा झाल्यानंतर या विहिरी पुन्हा भरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या विहिरींच्या खालच्या भागात असणाऱ्या पुंध्ये या गावासाठीच्या विहिरीत कमी पाणी जमा होत असल्याने या गावासाठी पाणी पुरवणे मुश्कील झाले असल्याने आता या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, यंदा पाण्याची बिकट अवस्था असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हा तलाव अनेक वर्षांपूर्वीचा असून या तलावातील गाळ काढून त्याची उंची वाढवून गळती थांबवल्यास या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी तीनही ग्रामपंचायतींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पुणधे ग्रामपंचायतीचे सदस्य रामकृष्ण निचिते यांनी सांगितले.