शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

एका तलावातून चार गावांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:40 IST

शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे. आता तर एक तलाव आणि चार गावे अशी परिस्थिती असून पाणी मिळणार कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे.तालुक्यातील साखरोली, कानविंदे, कळमगाव या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एकमेव तलावातून पुणधे, आटगाव, साखरोली, कानविंदे आणि ११ पाड्यांत पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा पुरवठा सुरळीत होता. मात्र, दोन वर्षांपासून याच गावपाड्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. तलावातील पाणीपातळी पाहता गावपाड्यांना किती आणि कसा पुरवठा होऊ शकतो, हाच मोठा प्रश्न आहे.साखरोली गावानजीक एक तलाव असून यातूनच आटगाव, कळमगाव, कानविंदे या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच तलावाच्या खाली कानविंदे, आटगाव आणि त्यातही खाली पुंध्येगावासाठीची विहीर बांधण्यात आली आहे. सध्या पाण्याची मागणी पाहता कळमगाव, कानविंदे आणि आटगाव यांच्यासाठी असणाऱ्या विहिरीचे दररोज पाणी लागते आहे. उपसा झाल्यानंतर या विहिरी पुन्हा भरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या विहिरींच्या खालच्या भागात असणाऱ्या पुंध्ये या गावासाठीच्या विहिरीत कमी पाणी जमा होत असल्याने या गावासाठी पाणी पुरवणे मुश्कील झाले असल्याने आता या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, यंदा पाण्याची बिकट अवस्था असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हा तलाव अनेक वर्षांपूर्वीचा असून या तलावातील गाळ काढून त्याची उंची वाढवून गळती थांबवल्यास या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी तीनही ग्रामपंचायतींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पुणधे ग्रामपंचायतीचे सदस्य रामकृष्ण निचिते यांनी सांगितले.