शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

मुंबई-नाशिक महामार्गामधून वाहते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की नाल्याचा बांध, असा सवाल वाहनचालक करत आहेत. या प्रकारामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

महामार्गावरील चेरपोली घाटातील नांगर देवाजवळ रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने पडणाऱ्या पावसाचे पाण्याचे पाट वाहत आहेत. त्यातून वाहने चालविणे अवघड होत आहे. दुचाकीस्वारांची तर परवाच केली जात नाही. रस्त्यावरील पाणी बाजूने जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे नाकातोंडात जात आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालवणे आणखी अवघड होऊ जाते, असे काही दुचाकीस्वारांनी सांगितले.

या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत असून अनेक जणांचे बळी येथे गेले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे तर ही परिस्थिती अधिक भयावह होत आहे. या महामार्गावर वाहनचालकांकडून टोल घेतला जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने व यंत्रणेने रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणार नाही, यासाठी रस्त्याला उतार देणे, यांसारख्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

‘कंपन्यांना काळ्या यादीत टाका’

सध्या महामार्गाची परिस्थिती पाहता हा महामार्ग आहे की पाण्याचा नाला हेच समजत नाही. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे असे निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश विशे यांनी केली आहे.

-----------