शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गामधून वाहते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की नाल्याचा बांध, असा सवाल वाहनचालक करत आहेत. या प्रकारामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

महामार्गावरील चेरपोली घाटातील नांगर देवाजवळ रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने पडणाऱ्या पावसाचे पाण्याचे पाट वाहत आहेत. त्यातून वाहने चालविणे अवघड होत आहे. दुचाकीस्वारांची तर परवाच केली जात नाही. रस्त्यावरील पाणी बाजूने जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे नाकातोंडात जात आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालवणे आणखी अवघड होऊ जाते, असे काही दुचाकीस्वारांनी सांगितले.

या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत असून अनेक जणांचे बळी येथे गेले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे तर ही परिस्थिती अधिक भयावह होत आहे. या महामार्गावर वाहनचालकांकडून टोल घेतला जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने व यंत्रणेने रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणार नाही, यासाठी रस्त्याला उतार देणे, यांसारख्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

‘कंपन्यांना काळ्या यादीत टाका’

सध्या महामार्गाची परिस्थिती पाहता हा महामार्ग आहे की पाण्याचा नाला हेच समजत नाही. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे असे निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश विशे यांनी केली आहे.

-----------