शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

मुंबई-नाशिक महामार्गामधून वाहते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर नांगर देवाजवळ मधोमध चक्क पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की नाल्याचा बांध, असा सवाल वाहनचालक करत आहेत. या प्रकारामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

महामार्गावरील चेरपोली घाटातील नांगर देवाजवळ रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने पडणाऱ्या पावसाचे पाण्याचे पाट वाहत आहेत. त्यातून वाहने चालविणे अवघड होत आहे. दुचाकीस्वारांची तर परवाच केली जात नाही. रस्त्यावरील पाणी बाजूने जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे नाकातोंडात जात आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालवणे आणखी अवघड होऊ जाते, असे काही दुचाकीस्वारांनी सांगितले.

या महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत असून अनेक जणांचे बळी येथे गेले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे तर ही परिस्थिती अधिक भयावह होत आहे. या महामार्गावर वाहनचालकांकडून टोल घेतला जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने व यंत्रणेने रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहणार नाही, यासाठी रस्त्याला उतार देणे, यांसारख्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

‘कंपन्यांना काळ्या यादीत टाका’

सध्या महामार्गाची परिस्थिती पाहता हा महामार्ग आहे की पाण्याचा नाला हेच समजत नाही. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे असे निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश विशे यांनी केली आहे.

-----------