शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात सर्वत्र बरसल्या जलधारा

By admin | Updated: July 16, 2017 02:56 IST

मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सरासरी ८१.५० मिमी पाऊस झाला असून सात घरांचे नुकसान झाले आहे. माळशेज घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार आणि रविवारी, असे दोन दिवस माळशेज घाटमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटनप्रेमी नाराज झाले आहेत.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शनिवारीही त्याचा जोर जिल्ह्यात कायम होता. जिल्ह्यात २४ तासांत एकूण ६७०.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यात १६८ मिमी सार्वधिक पाऊस मुरबाड तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ भिवंडी तालुक्यात ११० मिमी पाऊस झाला आहे. कल्याणमध्ये ९७ मिमी, अंबरनाथमध्ये ९०.६० मिमी, उल्हासनगर ८० मिमी, ठाणे ७२ मिमी आणि सर्वात कमी शहापूर तालुक्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ठाणे शहरातही मागील २४ तासांत ८१.५० मिमी पाऊस झाला असून विविध भागांत १० झाडे उन्मळून पडली आहेत. टिटवाळा येथील रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पुलावरून शुक्रवारी पाणी गेले होते. त्यामुळे १०-१२ गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, शनिवारी या पुलावरील पाणी ओसरल्याने पूल वाहतुकीसाठी खुला झाला. तर, कल्याण-मुरबाड महामार्गावरी टाटा पॉवर हाउससमोरील रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रेवती गावाजवळ भिंतीवर झाड पडले आहे. रायता-मानिवली रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरातून माती ढासळू लागल्याचे मानिवलीच्या सरपंच सुनीता गायकर यांनी सांगितले.कळव्यात सात घरे पडली : कळव्याच्या डोंगरावर वसलेल्या घोलाईनगर येथील तीन घरे त्या घराच्या खालील चार घरांवर पडली. त्यात एकूण सात घरांचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.