शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

ठाणे जिल्ह्यात सर्वत्र बरसल्या जलधारा

By admin | Updated: July 16, 2017 02:56 IST

मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सरासरी ८१.५० मिमी पाऊस झाला असून सात घरांचे नुकसान झाले आहे. माळशेज घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार आणि रविवारी, असे दोन दिवस माळशेज घाटमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटनप्रेमी नाराज झाले आहेत.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शनिवारीही त्याचा जोर जिल्ह्यात कायम होता. जिल्ह्यात २४ तासांत एकूण ६७०.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यात १६८ मिमी सार्वधिक पाऊस मुरबाड तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ भिवंडी तालुक्यात ११० मिमी पाऊस झाला आहे. कल्याणमध्ये ९७ मिमी, अंबरनाथमध्ये ९०.६० मिमी, उल्हासनगर ८० मिमी, ठाणे ७२ मिमी आणि सर्वात कमी शहापूर तालुक्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ठाणे शहरातही मागील २४ तासांत ८१.५० मिमी पाऊस झाला असून विविध भागांत १० झाडे उन्मळून पडली आहेत. टिटवाळा येथील रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पुलावरून शुक्रवारी पाणी गेले होते. त्यामुळे १०-१२ गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, शनिवारी या पुलावरील पाणी ओसरल्याने पूल वाहतुकीसाठी खुला झाला. तर, कल्याण-मुरबाड महामार्गावरी टाटा पॉवर हाउससमोरील रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रेवती गावाजवळ भिंतीवर झाड पडले आहे. रायता-मानिवली रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरातून माती ढासळू लागल्याचे मानिवलीच्या सरपंच सुनीता गायकर यांनी सांगितले.कळव्यात सात घरे पडली : कळव्याच्या डोंगरावर वसलेल्या घोलाईनगर येथील तीन घरे त्या घराच्या खालील चार घरांवर पडली. त्यात एकूण सात घरांचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.