शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर शहरांमध्ये पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:30 IST

स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी शहाड येथे फुटली : दुरुस्तीस लागणार १४ तास लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : ठाणे शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा करणारी स्टेमची मुख्य जलवाहिनी शहाड मुख्य हेडक्वॉर्टरजवळ फुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, सकाळी ती फुटली. नदीपात्रात ती भूमिगत असल्याने तिच्या दुरुस्तीसाठी १२ ते १४ तास लागणार असल्याची महापालिकेने दिली.

       १८५० व्यासाच्या या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष पाणीपुरवठा रोज होत आहे. त्यामुळे संपूर्ण ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी शहरावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.    स्टेमच्या या जलवाहिनीचा वीजपुरवठा रात्री खंडित झाला होता. त्यानंतर, सकाळी ती एका ठिकाणी लिकेज झाली, तर अन्य एका ठिकाणी फुटली. सहा तासांत ३ वेळा वीज खंडित झाल्याने त्याचा परिणाम या जुन्या आणि ३० वर्षे जीर्ण झालेल्या जलवाहिनीवर झाला. ती ज्या ठिकाणी फुटली आहे, ती जागा नदीजवळ खाली असल्याने, दुरुस्तीसाठी स्टेम प्राधिकरणाला १२ ते १४ तास लागणार आहेत. 

   या संदर्भात महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, रात्री १२ नंतरच ती दुरुस्त होऊ शकणार आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.

‘स्टेम’चा येथे होतो पाणीपुरवठास्टेम प्राधिकरणाच्या या जलवाहिनीतून ठाणे शहरासह मीरा-भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका आणि भिवंडी ग्रामीण भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागांचाही पाणीपुरवठा बंद केला आहे. स्वत:ची पाणीपुरवठा योजना असल्याने, त्याचा जास्तीचा परिणाम ठाणे शहरावर होणार नसला, तरी मीरा-भाईंदर आणि भिवंडीला पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पाण्याअभावी तेथील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात झोननिहाय नियोजन; ठिकठिकाणी चार तास पुुरवठा राहणार बंद n ठाणे शहराला या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष लीटर रोज पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणीकपातीची झळ बसण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर पाण्याचे झोननिहाय नियोजन करण्यात येणार आहे. n त्यानुसार, घोडबंदरचा पाणीपुरवठा चार तास बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर ठाणे शहराचा चार तास त्यानंतर उर्वरीत भागात चार तास पाणीपुरवठा बंद ठेवून कोणत्याही भागाला पाण्यापासून वंचित न ठेवता कमी दाबाने तो केला जाणार आहे.n यामुळे ठाणेकरांनी पाण्याचा अतिवापर न करता, जोपर्यंत जलवाहिनी दुरुस्त होत नाही, तोपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.