शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

ग्रामीण भागांत आजपासून अडीच दिवसांची पाणीकपात

By admin | Updated: February 17, 2016 02:04 IST

ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी

कल्याण : ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी ६ अशी अडीच दिवसांची (६० तासांची) पाणीकपात लागू केली जाणार असल्याची माहीती एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी दिली.उपलब्ध असलेल्या पाणीसाठयाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस ठाणे जिल्हयात पाणीबाणी लागू केली होती. परंतु, सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवूनही उर्वरीत दिवशीही कल्याण डोंबिवलीत पाण्याची बोंबाबोंब कायम राहिल्याने ही पाणीकपात रद्द करावी लागली होती. यानंतर पूर्वीचे जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात मंगळवार आणि शनिवार या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल याअनुषंगाने या आठवडयापासून एमआयडीसीने ६० तासांची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बारवीमध्ये ९० आणि आंद्रा धरणात ६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो केवळ १०५ दिवस पुरेल इतकाच असल्याने हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसह ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, मिरा-भार्इंदर आदी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.