शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागांत आजपासून अडीच दिवसांची पाणीकपात

By admin | Updated: February 17, 2016 02:04 IST

ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी

कल्याण : ठाणे जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्रा धरणामध्ये १०५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एमआयडीसीकडून बुधवार सायंकाळ ६ ते शनिवारी सकाळी ६ अशी अडीच दिवसांची (६० तासांची) पाणीकपात लागू केली जाणार असल्याची माहीती एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी दिली.उपलब्ध असलेल्या पाणीसाठयाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस ठाणे जिल्हयात पाणीबाणी लागू केली होती. परंतु, सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवूनही उर्वरीत दिवशीही कल्याण डोंबिवलीत पाण्याची बोंबाबोंब कायम राहिल्याने ही पाणीकपात रद्द करावी लागली होती. यानंतर पूर्वीचे जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात मंगळवार आणि शनिवार या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल याअनुषंगाने या आठवडयापासून एमआयडीसीने ६० तासांची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बारवीमध्ये ९० आणि आंद्रा धरणात ६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तो केवळ १०५ दिवस पुरेल इतकाच असल्याने हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसह ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, मिरा-भार्इंदर आदी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.