शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

ठाण्याला भेडसावतेय पाणीबाणीचे संकट

By admin | Updated: July 8, 2015 22:23 IST

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस

ठाणे : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा आटू लागला आहे. त्यामुळेच महापालिकेने ठाणेकरांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. एमआयडीसी आणि स्टेमचा पाणीसाठा हा १३ टक्क्यांवर आला असून शहराला जेमतेम २० ते २५ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्राधिकरणाकडून शहरात अनेक ठिकाणी पाणीकपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे आहेत. तर पालिकेच्या स्वत:च्या योजनेत दोन महिन्यांचा साठा शिल्लक असल्याने शहरातील काही भागांवर फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाण्याला आज विविध स्रोतांच्या माध्यमातून ४७२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचे हे प्रमाण २२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ४शहरात आजघडीला ४५ टक्के पाणीगळती असल्याचे पालिकेने मान्य केले असून पाणीनियोजन आणि वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने ठाणेकरांना आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यातच, डिसेंबरपासून महापालिका हद्दीत १४ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. ४एक आठवडा ठाणे शहर आणि दुसरा आठवडा कळवा, मुंब्रा, दिवा अशा पद्धतीने १४ टक्के कपात केली जात आहे. परंतु, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे पालिकेमार्फत केली जाणारी पाणीकपात दोन आठवडे केली नव्हती. ४आता पावसाने दडी मारल्याने ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. शहरातील काही भाग वगळल्यास उर्वरित भागांना ती अधिक जाणवणार आहे. यात स्टेम, एमआयडीसीकडून कळवा, मुंब्रा, विटावा, दिवा, बाळकुमचा काही भाग, पडलेगाव, गणपतीपाडा, आतकोनेश्वरनगर, वाघोबानगर आदी भागांना फटका बसणार आहे.