शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ठाण्याला भेडसावतेय पाणीबाणीचे संकट

By admin | Updated: July 8, 2015 22:23 IST

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस

ठाणे : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा आटू लागला आहे. त्यामुळेच महापालिकेने ठाणेकरांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. एमआयडीसी आणि स्टेमचा पाणीसाठा हा १३ टक्क्यांवर आला असून शहराला जेमतेम २० ते २५ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्राधिकरणाकडून शहरात अनेक ठिकाणी पाणीकपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे आहेत. तर पालिकेच्या स्वत:च्या योजनेत दोन महिन्यांचा साठा शिल्लक असल्याने शहरातील काही भागांवर फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाण्याला आज विविध स्रोतांच्या माध्यमातून ४७२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचे हे प्रमाण २२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ४शहरात आजघडीला ४५ टक्के पाणीगळती असल्याचे पालिकेने मान्य केले असून पाणीनियोजन आणि वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने ठाणेकरांना आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यातच, डिसेंबरपासून महापालिका हद्दीत १४ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. ४एक आठवडा ठाणे शहर आणि दुसरा आठवडा कळवा, मुंब्रा, दिवा अशा पद्धतीने १४ टक्के कपात केली जात आहे. परंतु, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे पालिकेमार्फत केली जाणारी पाणीकपात दोन आठवडे केली नव्हती. ४आता पावसाने दडी मारल्याने ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. शहरातील काही भाग वगळल्यास उर्वरित भागांना ती अधिक जाणवणार आहे. यात स्टेम, एमआयडीसीकडून कळवा, मुंब्रा, विटावा, दिवा, बाळकुमचा काही भाग, पडलेगाव, गणपतीपाडा, आतकोनेश्वरनगर, वाघोबानगर आदी भागांना फटका बसणार आहे.